Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चिमणी गिधाडांना भारी पडली !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

चिमणी गिधाडांना भारी पडली !

Surajya Digital
Last updated: 2021/06/06 at 4:16 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मोदी सरकार आणि ट्विटर या दोघात सुप्त संघर्ष, वाद पाहवयास मिळत आहे. या सगळ्या घटनाक्रमावर गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘चिमणी गिधाडांना भारी पडली ! ‘ असं ट्विट करत सरकारला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

चिमणी गिधाडांना भारी पडली! pic.twitter.com/rc8cTAONif

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 5, 2021

केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील या संघर्षावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक दृश्य ट्विट केलं आहे. ज्यात ट्विटरचा चिमणी असलेला लोगो आहे. या ‘लोगो’ला भगव्या रंगाने वेढा दिला असल्याचं दाखवण्यात आलं आहे आणि त्यातच ट्विटर हे नाव दिलेलं आहे. या फोटो बरोबरच एक ओळही आव्हाड यांनी लिहिली आहे. “चिमणी गिधाडांना भारी पडली,” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्या सुप्त संघर्ष सुरू असल्याचं दिसत आहे. केंद्राकडून नियमांची सक्ती केली जात असतानाच ट्विटरनेही नियमांवर बोट ठेवत, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक संघ नेत्यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक ट्विटरने काढून टाकली. ती नंतर पुर्नप्रस्थापितही करण्यात आली. मात्र, त्यावरून बरंच नाट्य रंगलं. यात केंद्राने ट्विटरला अखेरचा इशाराही दिला.

'टोपे दुसऱ्या विभागाबद्दल बोलतात, मी बोललो तर काय फरक पडतो?' https://t.co/9GHH8Tq4Hy

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021

केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यासाठी नवी नियम लागू केले आहेत. केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना २६ मेपर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक होते. या नियमावरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्या संघर्ष झाल्याचंही बघायला मिळालं. यासंदर्भात केंद्राकडून ट्विटरला वारंवार सूचना देण्यात आली होती, पंरतु ट्विटरने नियम पालनास नकार दर्शवला. त्यामुळे ही अखेरची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि ट्विटरमधील संघर्ष विकोपाला गेला आहे.

सोलापूरचे पालकमंत्री पद नको, सोलापूरपेक्षा आपलं इंदापूर आणि मुंबईच बरी https://t.co/8rwisqKcDg

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार

TAGGED: #chimney #fellheavily #onvultures!, #चिमणी #गिधाडांना #भारीपडली ! #पॉलिटिकल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘टोपे दुसऱ्या विभागाबद्दल बोलतात, मी बोललो तर काय फरक पडतो?’
Next Article उद्या सोमवारपासून सोलापूर शहर पूर्णपणे खुले होणार

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?