Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखू शकणार नाही- हिमंता बिस्वा सरमा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखू शकणार नाही- हिमंता बिस्वा सरमा

Surajya Digital
Last updated: 2025/06/03 at 3:13 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

दिसपूर, 03 जून (हिं.स.) : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार मोडीत काढल्यामुळे चिडलेल्या पाकिस्तानने म्हंटले होते की, चीन देखील ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी रोखू शकतो. ज्यामुळे ईशान्य भारतात दुष्काळ निर्माण होईल. पाकिस्तानच्या या धमकीला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तथ्यांच्या आधारे प्रत्युत्तर देत चीनची कितीही इच्छा असली तर ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखू शकत नसल्याचे म्हंटले आहे.

पाकिस्तानला असा विश्वास वाटतो की भारत चीनकडून येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. तथापि, हिमंता बिस्वा सरमा यांनी पाकिस्तानचे हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या संदेशात हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, ब्रह्मपुत्रा नदी तिच्या पाण्यापैकी फक्त 30 ते 35 टक्के पाणी चीनमधून आणते. ब्रह्मपुत्रा नदीला हे पाणी हिमालयातील हिमनद्या वितळण्यापासून आणि पावसापासून मिळते.

उर्वरित 65 ते 70 टक्के नदीचे पाणी भारतात वाहणाऱ्या नद्यांमधून आणि पावसातून येते. ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचा मुख्य स्रोत अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम आणि नागालँडमध्ये होणारा मुसळधार पाऊस आहे. याशिवाय, सुबानसिरी, लोहित, कामेंग, मानस, धनसिरी, जिया भराली, कोपिली, दिगारू आणि कुल्सी सारख्या अनेक उपनद्या ब्रह्मपुत्रेत येऊन मिळतात, ज्यामुळे नदीचा पाण्याचा प्रवाह वाढतो. जेव्हा ब्रह्मपुत्र नदी चीन आणि भारताच्या सीमेवर भारतात प्रवेश करते तेव्हा तिचा पाण्याचा प्रवाह प्रति सेकंद 2 ते 3 हजार घनमीटर असतो. तथापि, पावसाळ्यात, आसामच्या मैदानी भागात नदीच्या पाण्याचा प्रवाह प्रति सेकंद 15 ते 20 घनमीटरपर्यंत वाढतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

You Might Also Like

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रसिद्ध टीव्ही अभिनेता विभु राघव याचं निधन
Next Article पंजाब : पाकिस्तानी गुप्तहेराला अटक

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?