Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी भारत दौऱ्यावर; सीमा वादावर होणार द्विपक्षीय चर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी भारत दौऱ्यावर; सीमा वादावर होणार द्विपक्षीय चर्चा

admin
Last updated: 2025/08/16 at 8:30 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – भारत सरकारने चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भारत दौऱ्याची अधिकृत पुष्टी केली असून, या दौऱ्यात भारत-चीन सीमा वादावर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. वांग यी १८ ते १९ ऑगस्टदरम्यान भारतात येणार असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्या निमंत्रणावर हा दौरा होत आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वांग यी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत-चीन सीमा प्रश्नावर दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्ये चोवीसाव्या फेरीची बैठक होणार आहे. या चर्चेत भारताचे प्रतिनिधित्व अजित डोभाल करतील, तर चीनकडून वांग यी सहभागी होतील. याशिवाय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देखील वांग यी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या दौऱ्याची पुष्टी केली आहे. त्यांच्या निवेदनानुसार, चीन-भारत सीमा प्रश्नावर विशेष प्रतिनिधींची ही चोवीसावी फेरी असणार आहे.

हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा रशियाकडून तेल खरेदी करताना अमेरिका भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले आहे. भारताने या निर्णयाला अन्यायकारक म्हटले असून, एनएसए डोभाल यांनी नुकताच रशियाचा दौरा करून त्यानंतर वांग यी यांना भारतात आमंत्रित केले होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. मोदी यांचा मागील चीन दौरा २०१८ मध्ये झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये शी जिनपिंग भारतात आले होते. पूर्व लडाख सीमावादानंतर तणाव निर्माण झाला असला तरी गेल्या वर्षी रशियातील कजान येथे मोदी-जिनपिंग भेटीनंतर संवाद पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रशियाच्या सैनिकी कारखान्यात भीषण स्फोट; ११ ठार, १३० जखमी
Next Article सोलापुरातील १३४८ सदनिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?