Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मृत्यूतांडव सुरुच; 100 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मृत्यूतांडव सुरुच; 100 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2023/10/05 at 10:37 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पुन्हा मागील 24 तासांत आणखी 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे 4 दिवसांत मृत्यूचा आकडा हा 51 वर गेला आहे. 2 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. The death throes continue; 100 people claimed to have died, a case of culpable homicide has been registered at Nanded Government Hospital यानंतर 3 ऑक्टोबर रोजी 7 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 4 ऑक्टोबर रोजी 6 जणांनी आपला जीव गमावला. येथील मृत्यूचे प्रमाण थांबले नाही. दरम्यान, अधिष्ठात्यासह काही डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

मृतांचा आकडा काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. कारण मागील 24 तासांत याच रुग्णालयात आणखी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात तीन बालकांचा समावेश आहे. त्यामुळे मागील चार दिवसांत नांदेड शासकीय रुग्णालयात मृतांची संख्या 51 वर पोहचली आहे. 2 ऑक्टोबर रोजी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

नांदेड शासकीय रुग्णालयात मागील चोवीस तासात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला असून, ज्यात 3 बालकांचा समावेश आहे. गेल्या चार दिवसांत या रुग्णालयात मृतांची संख्या 51 वर पोहचली आहे. 2 ऑक्टोबरला सर्वाधिक 24 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 3 ऑक्टोबरला 7 जणांचा मृत्यू झाला. 4 ऑक्टोबरला पुन्हा 6 रुग्णांचा जीव गेला आणि आता मागील 24 तासांत आणखी 14 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे.

नांदेडमधील शासकीय रुग्णालयात मागील चार ते पाच दिवसांत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, असा धक्कादायक दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. याला शासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. औषधा अभावी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे मंत्रीपदी राहण्याच्या योग्य नाहीत. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

असा मृत्यूतांडव सुरु असताना राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. उद्या केंद्रीय गृहमंत्रालयाची बैठक होणार आहे. त्यासाठी शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचे समजते. दरम्यान, नुकताच शिंदे आणि फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला होता. आता पुन्हा शिंदे दिल्लीला रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तत्काळ भेट देऊन पाहणी करावी, आणि सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे.

उपचारांअभावी रुग्ण दगावल्यांच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाकडून आज मुंबईत ठिकठिकाणी सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ शरद पवार गटाने आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. तसेच, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जशी परिस्थिती राज्यात आहे तीच परिस्थिती मुंबईत देखील आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये औषधे नसल्याचा आरोप यावेळी शरद पवार गटाच्या मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव यांनी केला आहे. या वेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला.

 

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #death #throes #continue #100people #claimed #died #case #culpable #homicide #registered #Nanded #GovernmentHospital, #मृत्यूतांडव #100जणांचा #मृत्यू #दावा #सदोष #मनुष्यवध #गुन्हा #दाखल #नांदेड #शासकीय #रुग्णालय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर मंदिर समितीपुढे पेच; कार्तिकी पुजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा ?
Next Article सोलापुरात भर शाळेतच मुख्याध्यापकाला बदडले, महिला केंद्र प्रमुखालाही केली दमदाटी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?