Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोणत्याही समाजातील पुजाऱ्यांकडून पूजाअर्चा व कार्ये करून घ्या : प्रकाश आंबेडकर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

कोणत्याही समाजातील पुजाऱ्यांकडून पूजाअर्चा व कार्ये करून घ्या : प्रकाश आंबेडकर

Surajya Digital
Last updated: 2022/05/13 at 12:46 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

□ राष्ट्र सेवा दलाच्या पंढरपूर येथील कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

□ तनपुरे महाराज यांना पहिला साने गुरुजी समता पुरस्कार

पंढरपूर  : विठ्ठल मंदिर खुले झाले, आता पुढे काय ? जातीची उतरंड आता संपवली पाहिजे. कोणत्याही समाजातील पुजाऱ्यांकडून पूजाअर्चा व कार्ये करून घेता आली पाहिजे, त्यातून समाजात पुढच्या नव्या प्रवासाला सुरवात होईल, असे आवाहन बहुजनांचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात केलं.

साने गुरुजी यांच्या उपोषणानंतर  खुलं झालेल्या विठ्ठल मंदिर प्रवेशाच्या 75 वर्षेपूर्ती निमित्त राष्ट्र सेवा दलाने बुधवारी (11 मे रोजी) आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य होते. कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील, पन्नालाल सुराणा, भारत लाटकर, राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, राज्य सचिव नवनाथ गेंड, अतुल देशमुख, सुशीला मोराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यभरातून पाच हजारांहून अधिक सेवा दल साथी या कार्यक्रमासाठी पंढरपूरात आले होते.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, आज देशात सर्वांना मान्य होईल असा एकही नेता नाही. सर्व नेते आपल्या जाती – गटापुरते संकुचित झाले आहेत. जात, भाषा, धर्म, प्रांत भेद वाढलेत. त्यामुळे समाजाचे विघटनाच्या उंबरठ्यावर उभा आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून 1 मे ते 10 मे 1947 रोजी साने गुरुजी यांनी पंढरपूर येथे उपोषण केले होते. त्यानंतर सर्वांसाठी श्री विठ्ठल मंदिर खुलं झालं. त्या घटनेला यंदा 75 वर्षे झाली. त्यानिमित्ताने राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पंढरपूरच्या शिवाजी चौकात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तनपुरे महाराज मठ ते शिवाजी चौक अशी समता दिंडी काढण्यात आली होती. भजन सम्राट अजित कडकडे यांच्या अभंग गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

□ तनपुरे महाराज यांना पहिला साने गुरुजी समता पुरस्कार

पंढरपुरात साने गुरुजींच्या उपोषणाला जागा मिळत नव्हती. गाडगे महाराजांचे सहकारी कुशाबा तनपुरे महाराजांनी त्यांच्या मठात जागा उपलब्ध करून दिली. त्या तनपुरे महाराजांचे सुपुत्र ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना सामाजिक सलोखा व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल राष्ट्र सेवा दलाचा पहिला साने गुरुजी समता पुरस्कार यावेळी देण्यात आला.

पुरस्कार स्वीकारताना बद्रीनाथ महाराज म्हणाले, बहुजन समाज आजही मंदिराच्या विविध हक्कांपासून उपेक्षित आहे. साने गुरुजींच्या कार्यात खारीचा वाटा आम्हा कुटुंबियांना उचलता आला.  माझे वडील त्या कार्यात सहभागी होते. मी महाराज असूनही उपेक्षित आहे,  मला साने गुरुजींच्या नावाने पुरस्कार दिला हा मोठा गौरव मी समजतो.

 

□ 75 वर्षांपूर्वीचे साने गुरुजींचे प्रश्न आजही जिवंत – कपिल पाटील

राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यावेळी बोलताना म्हणाले, स्वातंत्र्य जवळ आलं होतं तेव्हा साने गुरुजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची चर्चा सुरू केली. मिळणारं स्वातंत्र्य दलित, गरिबांपर्यंत कसे पोचेल? सामाजिक विषमता कधी, कशी संपणार? यासाठी साने गुरुजींनी महाराष्ट्र दौरा केला.

पंढरपूर उपोषणाच्या आधी. त्या दौऱ्यात या प्रश्नांची चर्चा घडवून त्यांनी महाराष्ट्र मन ढवळून जागं केलं होतं. मंदिर खुलं होण्याचा मुद्दा होताच, पण सवर्णांच्या मनाची कवाडं खुली व्हावी असा साने गुरुजींच्या उपोषणामागे हेतू होता. ते प्रश्न आजही जिवंत आहेत. त्या प्रश्नांशी आज आपल्याला भिडावं लागेल. त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. गांधी – आंबेडकर विचारच आपल्याला पुढे जायचा रस्ता दाखवतील.

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #Worship #perform #deeds #priests #community #PrakashAmbedkar #Pandharpur, #समाज #पुजारी #पूजाअर्चा #कार्ये #प्रकाशआंबेडकर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article co-operative societies सोलापूर जिल्ह्यातील 20 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले
Next Article मोहोळमध्ये पहाटे पीकअप आयशरवर आदळला, दोन ठार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?