Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

admin
Last updated: 2025/03/17 at 7:40 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 17 मार्च (हिं.स.) – महाराष्ट्रातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने कृषी क्षेत्रातील समस्या सोडवाव्यात, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीने आणि पुरेशी आर्थिक मदत द्यावी, कृषीपूरक व्यवसायांना आर्थिक व तांत्रिक पाठबळ द्यावे तसेच त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण, घरकुल आणि वैद्यकीय विमा मिळावा, अशा महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. महसूल व वन विभाग तसेच कृषी व फलोत्पादन विभागाच्या मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून त्यांनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्यामागे कर्जबाजारीपणा, पिकाच्या उत्पादनात घट, जलसिंचनाची अपुरी सुविधा, वित्तीय मदतीचा अभाव आणि कृषी उत्पन्नातील चढ-उतार ही प्रमुख कारणे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी निदर्शनास आणून दिले. या समस्या सोडवण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी क्षेत्राच्या कार्यपद्धतीत सुधारणा करून नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी धोरणे आखली जावीत. त्याचप्रमाणे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्यात यावी आणि पात्रता निकष अधिक सुटसुटीत करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळेल, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

राज्य शासनाने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी विविध योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर, जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणि कृषी सिंचन प्रकल्पांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील मुलांना मोफत शिक्षण मिळावे, त्यांना घरकुल योजनेंतर्गत घरे उपलब्ध करून द्यावीत आणि त्यांच्या कुटुंबांसाठी दीर्घकालीन वैद्यकीय विमा सुविधा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर, आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे मानसिक खच्चीकरण टाळण्यासाठी त्यांचे समुपदेशन तज्ज्ञ संस्थांमार्फत किंवा प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या सहाय्याने करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत आणि या संदर्भात प्रभावी उपाययोजना करून त्यांची अंमलबजावणी जलद गतीने करावी, असे आवाहनही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामविस्तार झालेच पाहिजे!
Next Article विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप ठरविणारा अर्थसंकल्प – अजित पवार

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?