Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन

admin
Last updated: 2025/05/09 at 7:46 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 09 मे (हिं.स.): जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी जिहादी दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांचे टार्गेट-किलींग केले होते. याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांना अद्दल घडवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या कारवाईचे कौतुक आणि भारतीय सैनिकांचे अभिनंद केले आहे.

यासंदर्भात संघाकडून जारी संदेशात म्हंटले आहे की, ऑपरेशन सिंदूर भारत सरकारच्या नेतृत्वात आणि सैन्य दलांनी उचलेले महत्त्वाचे पाऊल आहे. जे क्रूर हत्याकांड दहशतवाद्यांनी घडवून आणले आणि भ्याड हल्ला केला तेव्हापासूनच देशवासियांच्या मनात पीडित कुटुंबांना, माता भगिनींना न्याय मिळावा ही देशभावना होती. ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आम्ही सरकारचं आणि सैन्य दलांचं अभिनंदन करतो. सरकारने आणि सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवल्याने संपूर्ण देशाची हिंमत वाढली आहे आणि त्यांची छाती अभिमानाने फुगली आहे. पाकिस्तानने जे केले त्यानंतर भारतीय सैन्य दलांनी दिलेलं उत्तर ही महत्त्वाची आणि अपरिहार्य कारवाई होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरु आहे. अशा संकट काळात आम्ही तन-मन-धनासह देशाच्या सरकारच्या आणि सैन्य दलांच्या पाठिशी आहोत. पाकिस्तानी सैन्याकडून सामान्य नागरिकांचा विचार न करता हल्ले केले जात आहेत. सीमा भाग आणि धार्मिक स्थळे यांना लक्ष्य केले जातेय. या घटनांमध्ये ज्यांना प्राण गमावावा लागला त्यांच्या प्रति आमच्या सहवेदना आहेत. आम्ही त्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचे संघाने सांगितले.

सध्या आपण युद्धजन्य स्थितीत आहोत. या आव्हानात्मक परिस्थितीत संघ म्हणून आम्ही देशवासीयांना आवाहन करत आहोत की सरकारने दिलेल्या सूचना आणि निर्देशांचं तंतोतंत पालन करा. तसेच राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात आपल्याला आपली एकजूट दाखवून देण्याची वेळ आली आहे. प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य बजावून सरकारतर्फे जे सांगितले जाईल त्याचे तंतोतंत पालन या काळात करायला हवे. तसेच सरकारला सहकार्य करायला हवे. देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा यासाठी आवश्यक असलेल्या सरकारच्या सगळ्या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.

You Might Also Like

दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात

पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार

आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे

आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article sucide सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
Next Article सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?