Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन

admin
Last updated: 2025/05/09 at 7:46 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 09 मे (हिं.स.): जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी जिहादी दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांचे टार्गेट-किलींग केले होते. याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांना अद्दल घडवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या कारवाईचे कौतुक आणि भारतीय सैनिकांचे अभिनंद केले आहे.

यासंदर्भात संघाकडून जारी संदेशात म्हंटले आहे की, ऑपरेशन सिंदूर भारत सरकारच्या नेतृत्वात आणि सैन्य दलांनी उचलेले महत्त्वाचे पाऊल आहे. जे क्रूर हत्याकांड दहशतवाद्यांनी घडवून आणले आणि भ्याड हल्ला केला तेव्हापासूनच देशवासियांच्या मनात पीडित कुटुंबांना, माता भगिनींना न्याय मिळावा ही देशभावना होती. ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आम्ही सरकारचं आणि सैन्य दलांचं अभिनंदन करतो. सरकारने आणि सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवल्याने संपूर्ण देशाची हिंमत वाढली आहे आणि त्यांची छाती अभिमानाने फुगली आहे. पाकिस्तानने जे केले त्यानंतर भारतीय सैन्य दलांनी दिलेलं उत्तर ही महत्त्वाची आणि अपरिहार्य कारवाई होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरु आहे. अशा संकट काळात आम्ही तन-मन-धनासह देशाच्या सरकारच्या आणि सैन्य दलांच्या पाठिशी आहोत. पाकिस्तानी सैन्याकडून सामान्य नागरिकांचा विचार न करता हल्ले केले जात आहेत. सीमा भाग आणि धार्मिक स्थळे यांना लक्ष्य केले जातेय. या घटनांमध्ये ज्यांना प्राण गमावावा लागला त्यांच्या प्रति आमच्या सहवेदना आहेत. आम्ही त्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचे संघाने सांगितले.

सध्या आपण युद्धजन्य स्थितीत आहोत. या आव्हानात्मक परिस्थितीत संघ म्हणून आम्ही देशवासीयांना आवाहन करत आहोत की सरकारने दिलेल्या सूचना आणि निर्देशांचं तंतोतंत पालन करा. तसेच राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात आपल्याला आपली एकजूट दाखवून देण्याची वेळ आली आहे. प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य बजावून सरकारतर्फे जे सांगितले जाईल त्याचे तंतोतंत पालन या काळात करायला हवे. तसेच सरकारला सहकार्य करायला हवे. देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा यासाठी आवश्यक असलेल्या सरकारच्या सगळ्या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.

You Might Also Like

गुंडांच्या हल्ल्यात मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना पालकमंत्री शिरसाट यांचे सांत्वन

ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक; खासदार गोपछडे यांना “पाठपुराव्याचे यश”

ओबीसी महामंडळातर्फे कर्जमाफी योजना; थकीत व्याजावर ५०% सवलत

कोकिलाबेन अंबानी यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

 भारतासोबत शत्रूवजा वागू नका – निक्की हेली यांचा इशारा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article sucide सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
Next Article सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?