लखनौ : गेल्या काही दिवसात जवळपास 100 मृतदेह गंगा नदीत तरंगताना आढळले आहेत. बिहारच्या बक्सर जिल्ह्यात 71 मृतदेह वाहून आले तर उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यात 25 पेक्षा जास्त मृतदेह नदीत वाहून आल्याचे सांगितले जात आहे. मृतदेह तरंगताना पाहून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यांचा मृत्यू कोरोनाने झाला असावा आणि लाकडं जाळायला नसल्याने मृतदेह नदीत फेकले असावे, अशी शंका गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
भारतीय महिलेच्या घरावर रॉकेट हल्ला, व्हिडिओ कॉलवर बोलत असताना मृत्यू, केरळमधील महिलेचा इस्त्रायलमध्ये मृत्यू https://t.co/cNRwvoLqyj
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीपात्रात आतापर्यंत सुमारे 100 मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह कोरोनाबाधितांचे असल्याची चर्चा असून, यामुळे दोन्ही राज्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु, या मृतदेहांच्या चाचणीचे अहवाल हाती न आल्याने ते कोरोनाबाधित होते की नव्हते हे स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाने या मृतदेहांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. याचे अहवाल हाती आल्यानंतर स्पष्टपणे बोलता येईल, अशी प्रशासनाने भूमिका घेतली आहे.
याची केंद्र सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे.
एसबीआयमध्ये नोकरीची संधी, करा वेळेत अर्ज दाखल
https://t.co/OStBHWPdCj
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. काही राज्यांमध्ये भयावह स्थिती आहे. त्यापैकी बिहार व उत्तर प्रदेशातील आरोग्य व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. रुग्णांच्या चाचण्यांपासून ते रुग्णांना बेड मिळणेपर्यंत अनेक अडथळे येत आहेत. आता रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यातही अडथळे येत असल्याची स्थिती आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. त्यातच आता गंगा नदीत सुमारे 100 मृतदेह वाहून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादीच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार, सीआरपीएफच्या निवृत्त जवानाला अटकhttps://t.co/4zDlbRryBJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
नदीत मृतदेह वाहून येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. हे मृतदेह कोरोनाबाधित नागरिकांचे आहेत किंवा नाहीत, याबाबतही स्पष्टता नाही. त्यामुळे नागरिकांना संसर्गाची भीती आहे. पाण्यातूनही संसर्ग होण्याची भीती असल्याने नागरिक नदीपात्रात जाण्यासही घाबरत आहेत.
सुरवातीला बिहारमधील बक्सरमध्ये गंगा नदी पात्रात 71 मृतदेह वाहून आले होते. नंतर उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे गंगा नदी पात्रात 25 मृतदेह सापडले होते. बिहार व उत्तर प्रदेश सीमेवर गंगा नदीमध्ये मागील काही दिवसांपासून मृतदेह वाहून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
राज्य राखीव पोलीस दलातील जवानांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय https://t.co/zqBTVYqmhZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
आता या संपूर्ण प्रकाराची दखल जलशक्ती मंत्रालयाने घेतली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत. ते म्हणाले की, गंगा नदीत मृतदेह टाकणे हे दुर्देवी आहे. मोदी सरकार गंगेचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दोन्ही राज्यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी, असे म्हटले आहे.
We have taken serious note of the issue of dumping dead bodies in River Ganga and instituted measures for the prohibition of the same.
The Centre through the NMCG and district authorities will ensure all unidentified bodies are disposed as per the protocol. pic.twitter.com/lfKBiGA0vE
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) May 11, 2021