नवी दिल्ली : क्रिकेटप्रेमीकरिता वाईट बातमी आहे. त्याची आवडती आशिया कप स्पर्धा रद्द केली आहे. करोनामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित केल्यानंतर आता आशिया कप २०२१ स्पर्धेचं आयोजन रद्द करण्यात आलं आहे. श्रीलंकेत या स्पर्धा होणार होत्या. तर भारताने आतापर्यंत ७ वेळा आशिया कपवर नाव कोरलं आहे. या स्पर्धेची अनेकांना उत्सुकता असते.
अनेकांना गमावलं, मोदींच्या डोळ्यात अश्रू https://t.co/mWICx2HsXq
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
करोनाचं संकट पाहता आयोजकांनी स्पर्धा रद्द करण्याची घोषणा केली. मागच्या वर्षी ही स्पर्धा पाकिस्तानात होणार होती. मात्र तेव्हाही ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. ‘करोना व्हायरसचं संकट पाहता आम्ही स्पर्धेचं आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढचे दोन वर्ष ही स्पर्धा होणार नाही. कारण आशिया कपमधील संघाचं दोन वर्षांचं नियोजन ठरलं आहे. त्यामुळे २०२३ विश्वचषकानंतर या स्पर्धेचं आयोजन होईल.’ असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डीसिल्वा यांनी सांगितलं.
अभ्यास करा, परीक्षा रद्द होणार नाही – वैद्यकीय शिक्षणमंत्री https://t.co/sdpGpxCYxb
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय संघाच्या व्यस्त नियोजनामुळे आशिया कपवर अनिश्चिततेचं सावट होतं. भारतीय संघ जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे आयोजकांना मोठं नुकसान झालं असतं असंही सांगण्यात येत आहे. जून महिन्यात आशिया कपचं श्रीलंकेत आयोजन करण्यात आलं होतं.
Bad News for Cricket Fans in Asia!
Asia Cup 2021 which was supposed to be placed among six cricket teams, is cancelled due to COVID19.
It will be played in 2022 instead.@ICC @ACBofficials @BCCI @BCBtigers @TheRealPCB @HamdHamdard pic.twitter.com/fCj27Z2N5g
— Hamdullah Hamdard (@HamdHamdard) May 21, 2021
भारताने आतापर्यंत ७ वेळा आशिया कपवर नाव कोरलं आहे. १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८ साली भारताने आशिया कप जिंकला आहे. २०१८ साली भारताने बांगलादेशला नमवून चषक आपल्या नावावर केला होता.
* चक्रीवादळामुळे वानखेडे मैदानाचे नुकसान
चक्रीवादळामुळे मुंबईला सोमवारी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या वानखेडे मैदानालाही वादळाचा फटका बसला आहे. या मैदानाचे नुकसान झाल्याची माहिती आता समोर आली आहे. मैदानातील नॉर्थ स्टँडची साईट स्क्रीन जोरदार वाऱ्यामुळे पडल्याचे सांगण्यात आले आहे. काही फोटोही व्हायरल झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय चहा दिवस ( 21 मे )
असा लागला चहाचा शोध… बापरे!!! जगभरात चहाचे एवढे प्रकार (ब्लॉग)https://t.co/0uSPazhOD8
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021