Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनाला पळवण्यासाठी दररोज पाच वेळा हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

कोरोनाला पळवण्यासाठी दररोज पाच वेळा हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आवाहन

Surajya Digital
Last updated: 2020/07/26 at 11:14 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

भोपाळ : कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी जगभरात लस शोधली जात असताना नेत्यांकडून मात्र मांडण्यात येणारे तर्कवितर्क लोकांना गोंधळात टाकत आहेत. भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचे नाव यात आता जोडले गेले आहे. त्यांनी कोरोना आजाराला पळवण्यासाठी दररोज पाच वेळा हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आवाहन केले आहे. यात प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की, देशात कोरोनाला संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक अध्यात्मिक प्रयत्न करुयात.

प्रज्ञासिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले की, कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी आणि लोकांचे आरोग्य चांगले राहवे यासाठी अध्यात्मिक प्रयत्न करु. येत्या पाच ऑगस्टपर्यंत आपल्या घरी दररोज सायंकाळी सात वाजता पाच वेळेस हनुमान चालिसाचे पठण करावे.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

पाच ऑगस्टला सायंकाळी घरात दिवे लावावेत आणि श्रीरामाची आरती करुन अनुष्ठानाची समाप्ती करावी. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ देखील शेअर केला आहे. त्यात म्हटले की, मध्य प्रदेशचे सरकार कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत असून भोपाळमध्ये चार ऑगस्टपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

चार तारखेला लॉकडाउन संपेल. पाच ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होईल आणि तो दिवस दिवाळीप्रमाणे साजरा होईल. जेव्हा देशात एकाच आवाजात हनुमान चालीसाचे पठण होईल तेव्हा तो आवाज नक्कीच प्रभावी ठरेल आणि आपल्याला कोरोनापासून मुक्ती मिळेल. प्रज्ञासिंह यांच्या या आवाहनाची सध्या चर्चा होत आहे. यापूर्वीही मध्य प्रदेशचे प्रोटेम स्पीकर रामेश्‍वर शर्मा यांनी अयोध्येत राम मंदिराच्या कामास सुरवात झाल्यानंतर कोरोना कमी होईल, असे वक्तव्य केले होते.

* केंद्रीय राज्यमंञी यांचे अजब तर्कवितर्क

– मागील आठवड्यात केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी हातात पापडाचं पॅकेट पकडलं होतं. हे पॅकेट ‘भाभीजी पापड’ कंपनीचं आहे. हे पापड खाल्यावर कोरोना होत नाही किंवा बाधित रुग्ण कोरोनामुक्त होतो, असा दावा मेघवाल यांनी केला होता.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #Pradnysing #हनुमानचालिसा #पठण #कोरोना #पळवून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर ग्रामीणमध्ये सहा मृत्यू तर नव्याने 154 नवीन बाधित रुग्ण
Next Article आपल्या 54 लाख निवृत्तीवेतन धारकांसाठी ‘या’ बँकेने आणली विशेष योजना, वाचा सविस्तर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?