Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल त्या दिवशी मी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणारच’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

‘ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल त्या दिवशी मी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणारच’

Surajya Digital
Last updated: 2021/05/20 at 9:07 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

रत्नागिरी : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी कोकणच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, या मुलाखतीत त्यांनी ‘आपण या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार’ असल्याच्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांचा कोकण दौरा केला. विरोधी पक्षनेते कोकणातील नुकसानीची पाहणी दौऱ्यावर गेले मात्र मुख्यमंत्र्यांचं ‘वर्क फ्रॉम होम’ कधी संपणार ? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे? विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शुक्रवारी कोकण दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. मात्र मुख्यमंत्र्यांआधीच देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

‘पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये अख्खी राष्ट्रवादी उतरली, संपूर्ण प्रशासनाचा गैरवापर करण्यात आला. पण जनतेनं आमच्या उमेदवाराला निवडणूक दिलं. मी पंढरपूरच्या जनतेला शब्द दिला होता या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करेल. मी माझ्या विधानावर ठाम आहे, पण आता सध्या ही वेळ नाही. आपण कोरोनाशी लढत आहोत, आम्हाला कोरोनाशी लढायचं आहे, या सरकारशी लढायचं नाही. ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल तेव्हा मी माझा शब्द खरा करून दाखवेल’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

‘रश्मी शुक्ला यांचा जो अहवाल आहे, तो जर बाहेर आला तर या सरकारला तोंड दाखवण्यासाठी जागा उरणार नाही. त्यामुळे हे सरकार न्यायालयात गेले आहे आणि चौकशी करू नये, अशी विनंती करत आहे. हे सरकार त्यांच्याच अंतर्विरोधामुळे पडेल हे मी आधीच सांगितलं होतं, आता त्याची वेळ जवळ येत आहे. त्याकडे वाटचाल आता सरकारची सुरू झाली आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

TAGGED: #corona's #time #willend #Government's #Correctprogram #Devendrafadnavis, #कोरोनाचा #काळ #संपेल #सरकारचा #करेक्टकार्यक्रम #देवेंद्रफडणवीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कमाईची सुवर्णसंधी; मोदी सरकार शेती सोलार पॅनलला देणार पैसे
Next Article अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच; ऑनलाइन की ऑफलाइन ?

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?