मुंबई / नवी दिल्ली : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवत आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळादरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार वारे वाहत आहेत. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
भारतीय तटरक्षक दलात 75 पदांसाठी भरती, तयारीला लागा https://t.co/mgCkpYBRgH
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळादरम्यान राज्यातील किनारपट्टी भागात जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
तौत्के चक्रीवादळाची कोकणाकडे वाटचाल तौत्के चक्रीवादळाने केरळ, गोव्यात थैमान घातल्यानंतर आता महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात आला आहे. तसेच येत्या काळात वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. तसेच पाऊसही सुरू आहे. या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. यामुळे रस्ते बंद झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे.
ठाकरे सरकारला सापडला म्युकरमायकोसिसवर जालीम उपाय https://t.co/EYIgPmG8Hb
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
अरबी समुद्रात सुरू असलेल्या तौक्ते वादळामुळे परभणी जिल्ह्यातही मागील तीन दिवसांपासून वादळी वारा सुरू असून, आज ढगांच्या गडगडाटासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासून परभणीत ढगाळ वातावरण होते. दुपारी ३ च्या सुमारास पावसाला सुरवात झाली. दरम्यान पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून गर्मीच्या उकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर शेतातील काढणी केलेली हळद आणि फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालीय तसेच भुईमूग काढणी खोळंबली आहेत.
चारवेळा संसदरत्न पुरस्कार सन्मानित खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाची चाचणी निगेटिव्ह येऊनही मृत्यू, झुंज अपयशी https://t.co/dNFQpyf1GQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या तौत्के या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात रविवारी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी वर्तवली आहे. या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर रविवारी ताशी ६० ते ८० कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत मच्छिमारांनी तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ आज पहाटे ४ च्या सुमारास गोव्याची सीमा ओलांडून सिंधुदुर्गच्या समुद्रात येणार असून दुपारी २ च्या दरम्यान सिंधुदुर्गची सीमा ओलांडून पुढे जाईल. त्यामुळे या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
तौत्के चक्रीवादळ गोव्यापासून काही किमी अंतरावर आहे. गोव्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. तिथे अनेक झाडं, विजेचे खांब उन्मळून पडल्याचा घटना समोर आल्या. दुसरीकडे महाराष्ट्रातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात तशीच परिस्थिती आहे. तसेच रत्नागिरीतही समुद्र खवळला आहे. त्यापाठोपाठ आता या वादळाचा फटका गुजरातलाही बसण्याची शक्यता आहे.
सोलापुरात लॉकडाऊनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याच्या अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी https://t.co/rcia6hI9ya
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
गुजरातच्या महिसागर भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळथधार पावसाला सुरुवात झालीय. सुरक्षेच्या पार्भूमीवर पुण्यातील एनडीआरएफची टीम महुआ गावाच्या दिशेला निघाली आहे. हे वादळ १८ मे रोजी गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज वर्तवला जातोय. गुजरातला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ मुंबईपासून ३८० किमा तर गुजरातपासून ७०० किमी लांब आहे.
'राजीव सातव यांच्या आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला' https://t.co/Mad0yTWUab
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
* ‘तोक्ते’ चक्रीवादळ- पावसाचा जोर वाढला, समुद्रात उंच लाटा
– रत्नागिरी जिल्हात पावसाचा जोर वाढला आहे. समुद्रात देखील उंच लाटा उसळत आहेत.
– काही ठिकाणी घरांचं देखील नुकसान झाले आहे. सध्या 60 – किमी प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहत आहेत.
– कणकवली तालुक्यातील अनेक घरांवर झाड पडली.
– काही ठिकाणी रस्त्यावर झाड कोसळून रस्ते अजूनही बंद आहेत तर ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
चक्रीवादळ गोव्याला धडकले; कर्नाटकात ४ जणांचा मृत्यू,वादळामुळे हवाई वाहतुकीवर परिणामhttps://t.co/hqfZgNrenB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021