Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पावसाचा जोर ओसरणार उद्यापासून उघडीप शक्य; द्राक्ष, डाळिंब, कांदा, भाजीपाल्यांचे नुकसान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

पावसाचा जोर ओसरणार उद्यापासून उघडीप शक्य; द्राक्ष, डाळिंब, कांदा, भाजीपाल्यांचे नुकसान

Surajya Digital
Last updated: 2021/12/04 at 9:58 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरणार असून उद्या रविवार, ५ डिसेंबरपासून उघडीप मिळून येणाऱ्या दिवसात थंडीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

गुजरातच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून दुसरीकडे बंगालच्या उपसागरात जेवाद चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर येत्या दोन दिवसात धडकणार आहे. परंतु याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नसल्याचेही सांगण्यात आले.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात झालेल्या या अवकाळी पावसाचा द्राक्ष, डाळिंब, कांदा व भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. ढगाळ हवामान आणि धुक्याचे प्रमाण वाढल्याने जवळपास सर्वच शेती पिकांवर अनिष्ट परिणाम झाला आहे.

सोलापूरसह अहमदनगर सांगली, सातारा, नाशिक, धुळे, नंदूरबार येथे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परिणामी येत्या काळात पालेभाज्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. हा पाऊस ज्वारीला पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ‘ला निनो’ सक्रिय झाल्याने डिसेंबर अखेर ते मार्चपर्यंत आणखी अवकाळी पावसाची शक्यता असल्याचेही हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यंदा अतिवृष्टी झाल्याने अगोदरच खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. अशातच रब्बी हंगामात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दक्षिण व उत्तर सोलापूर, अक्कलकोटसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे गुरुवारी फळबागांसह खरीप व रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. द्राक्ष, डाळिंब पिकांना या पाऊस आणि ढगाळ हवामानाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पावसामुळे भाजीपाल्यांचे नुकसान झाल्याने दरवाढीचे चटके नागरिकांना सोसावे लागणार आहेत.

गेल्या एक आठवड्यापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र २ डिसेंबरला मोठा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार गुरूवारी पहाटे शहरात सुरू झालेला पाऊस सकाळी साडेअकरापर्यंत चालूच होता. दुपारी काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरूच होती. रात्री दहानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला होता.

दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, वैराग, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, माळशिरस, माढा आणि पंढरपूर या तालुक्यांत जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फुलोरा अवस्थेतील द्राक्ष, डाळिंब या पिकांची मोठी हानी झाली असून पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

काढणीस आलेला कांदा, तूर या पिकांवरही अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. सततच्या पावसाने रब्बी ज्वारी आडवी झाली असून गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. अतिपावसामुळे हरभरा पीकही हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Heavyrains #recede #tomorrow #Damage #grapes #pomegranates #onions #vegetables, #पावसाचा #जोर #उघडीप #शक्य #द्राक्ष #डाळिंब #कांदा #भाजीपाला #नुकसान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री सिध्देश्वर कारखाना निवडणूक; छाननीत 46 उमेदवारांचे अर्ज नामंजूर
Next Article उद्या रविवारी अणदूरच्या खंडोबा देवस्थानची यात्रा; श्री खंडोबा आणि बाणाईचे विवाहस्थळ

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?