Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विठुरायाचे दर्शन घेऊन आपच्या स्वराज्य यात्रेस सुरुवात; महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी स्वराज्य यात्रा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

विठुरायाचे दर्शन घेऊन आपच्या स्वराज्य यात्रेस सुरुवात; महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी स्वराज्य यात्रा

Surajya Digital
Last updated: 2023/05/28 at 9:45 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

● खोके सरकारला सुबुद्धी मिळो आणि महाराष्ट्रातील जनतेला ही बळ मिळो

 

पंढरपूर : राज्यात ही जी पन्नास खोक्यांची सरकार तग धरून बसलेली आहे, ती लोकशाहीसाठी अत्यंत अपायकारक आहे. Start your Swarajya Yatra with darshan of Vithuraya; Swarajya Yatra to capture Maharashtra
Aam Aadmi Party आज कांद्याला योग्य भाव मिळत नाही, कापूस विकला जात नाही, परंतु ह्या सरकारला दयामाया उरली नसून हे सरकार निष्ठुर झाली आहे, अशी टीका राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या प्रीती शर्मा मेनन यांनी स्वराज्य यात्रा दरम्यान माध्यम प्रतिनिधी सोबत संवाद साधताना केली.

आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय नेत्यांच्या तसेच प्रभारी दिपक सिंघला तसेच सह-प्रभारी गोपाल इटालिया यांच्या निर्णयानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर “स्वराज्य यात्रा” काढणार आहोत. स्वराज्य यात्रेची सुरुवात पंढरपूर येथून झाली आहे. ती रायगडपर्यंत सुरू राहणार आहे. आज पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वराज्य यात्रेची सुरुवात झाली.

स्वराज्य यात्रेदरम्यान माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, खोके सरकार खूप मोठमोठ्या घोषणा करतात पण जमिनीवर काम काही होत नाही. आज कांद्याला योग्य भाव मिळत नाही, कापूस विकला जात नाही परंतु या सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेची काहीच दयामाया नाही.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

आज आम्ही विठ्ठलाचरणी हीच प्रार्थना करायला आलो आहोत की, ह्या सरकारला सुबुद्धी मिळो आणि महाराष्ट्रातील जनतेला ही बळ मिळो जेणेकरून ह्या जुलमी सरकारला सत्तेबाहेर जनता काढतील आणि एका खऱ्या अर्थाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य इथे स्थापन होईल.

 

पुढे बोलतांना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, या यात्रेमागचा मूळ उद्देश हा लोकांना जोडण्याचा आहे आणि लोकांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांची उजळणी करून देणे, हा आहे. कारण जनता आज ह्या पन्नास खोक्यांच्या सरकारपुढे हताश झालेली आहे. जनतेला त्यांचे स्वातंत्र्य परत मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या मताचे मोल काय आहे याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी आम्ही ही यात्रा काढत आहोत. आमचे महाराष्ट्राचे सर्व नेते, सह-प्रभारी गोपाळ इटालिया ह्यांच्या मार्गर्शनाखाली इथून रायगड पर्यंत जाऊन लोकांना जागृत करणार आहेत, असे मत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले.

आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील आगामी सर्व स्थानिक निवडणुका, तसेच लोकसभा आणि विधानसभा निडणुकाही लढणार असल्याचे वक्तव्य प्रीती शर्मा मेनन यांनी केले. पुढे बोलताना भाजपचा दुटप्पीपणा समोर आणत त्या म्हणाल्या की भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते. त्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी भाजप विरूद्ध एकवटले पाहिजे, यात काहीच दुमत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Start #your #Swarajya #Yatra #darshan #Vithuraya #SwarajyaYatra #capture #Maharashtra #AamAadmiParty, #विठुराया #दर्शन #आप #स्वराज्ययात्रा #सुरुवात #महाराष्ट्र #पिंजून #स्वराज्य #यात्रा #आमआदमीपक्ष
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राजकारण्यांचा ‘मेंदू’ कुठे गेलायं उचलली जीभ लावली टाळ्याला, कुणाचा कशात पायपोस नाही !
Next Article 170 गुरुजीचे भाग्य फळफळले; बढतीतून होणार हेडमास्तर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?