Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टोमॅटोबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्य सरकारला दिले खरेदीचे आदेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशशिवार

टोमॅटोबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्य सरकारला दिले खरेदीचे आदेश

Surajya Digital
Last updated: 2021/08/28 at 3:32 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं सर्व राज्यांना MIS योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत, असे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी टोमॅटोच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. अखेर मोदी सरकारने या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एमआयएस योजनेंतर्गत राज्य सरकारांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत, अशी सूचना मोदी सरकारने सर्व राज्यांना केली आहे.

टोमॅटो खरेदी करताना या व्यवहारात राज्य सरकारला जो तोटा सहन करावा लागेल, त्यातील 50 टक्के वाटा केंद्र सरकारकडून राज्याला देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून देशात टोमॅटोचे भाव मातीमाेल झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अक्षरक्ष: 25 पैसे किलोने टाेमॅटो विकण्याची वेळ आल्याने, शेतकरी बाजार समितीच्या आवारात टोमॅटो फेकून देऊन सरकारच्या नावाने शिमगा करीत आहेत.

सध्या देशात टोमॅटोचे भाव कमी झाल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एमआयएस योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी टोमॅटोच्या प्रश्नावर पियुष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

राज्यातील शेतकरी सध्या टोमॅटोचे भाव पडल्यामुळे त्रस्त होऊन आक्रमक झाले आहेत. एमआयएस योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालात राज्य सरकारला जो काही तोटा होईल, त्या तोट्यात केंद्र सरकारचा 50 टक्के वाटा असेल असं केंद्र सरकारच्यावतीने सांगण्यात आलं आहे. तसेच याबाबतीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवावा अशीही त्यांनी राज्याला विनंती केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात यावर्षी टोमॅटोचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न झालं आहे. मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्यामुळे भाव पडले आहेत. सध्या राज्यात टोमॅटोचे भाव प्रतिकिलो 2 ते 3 रूपये असे आहेत. या अल्पशा भावामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

You Might Also Like

इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग; ६० लोकांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

हरियाणा : रोहतकमध्ये पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सैन्य जवानाला अटक

बिहारमध्ये वीज मोफत होणार; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमारांची मोठी घोषणा

भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध थांबले नसते तर पुढे अण्वस्त्र युद्ध झालं असतं – डोनाल्ड ट्रम्प

TAGGED: #Bigdecision #central #government #tomatoes #purchase #order #state #government, #टोमॅटोबाबत #केंद्रसरकार #मोठानिर्णय #राज्यसरकारला #खरेदी #आदेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्या बॅनरवर फेकली काळी शाई
Next Article गांजा लागवड केल्यास गुन्हा दाखल करणार, जिल्हाधिकाऱ्यांनी ‘त्या’ शेतकऱ्याला सुनावले

Latest News

Massive fire at shopping mall in Iraq; 60 people killed, many missing
इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग; ६० लोकांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
देश - विदेश July 17, 2025
IndiGo's Delhi-Goa flight makes emergency landing in Mumbai; all passengers safe
इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचे मुंबईत आपत्कालीन लँडींग; सर्व प्रवासी सुरक्षित
Top News July 17, 2025
हरियाणा : रोहतकमध्ये पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
देश - विदेश July 17, 2025
Army jawan arrested for spying for Pakistan
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सैन्य जवानाला अटक
देश - विदेश July 17, 2025
Electricity will be free in Bihar; Chief Minister Nitish Kumar's big announcement before elections
बिहारमध्ये वीज मोफत होणार; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमारांची मोठी घोषणा
देश - विदेश July 17, 2025
लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार
महाराष्ट्र July 16, 2025
फौजा सिंग यांचा हिट अँड रन प्रकरणात एनआरआय अमृतपाल सिंग ढिल्लनला अटक
Top News July 16, 2025
देशात पहिली टेस्ला कार दाखल; प्रताप सरनाईक बनणार पहिले ग्राहक?
महाराष्ट्र July 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?