Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 15 तारखेपासून राज्यातील निर्बंध शिथिल; ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रीक टनच्या वर गेली की राज्यात लगेच कडक लॉकडाऊन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

15 तारखेपासून राज्यातील निर्बंध शिथिल; ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रीक टनच्या वर गेली की राज्यात लगेच कडक लॉकडाऊन

Surajya Digital
Last updated: 2021/08/11 at 10:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली. 15 ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश असणार आहे. तसेच धार्मिस्थळं व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.

या निर्णयाची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून होणार आहे. राज्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषेदेत राजेश टोपे यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू होणार अशी घोषणा सरकारने केली होती. परंतू या निर्णयाला राज्य सरकारने 24 तासांत ब्रेक दिला. टास्क फोर्स आणि पिडियाट्रिक टास्क फोर्स तसेच पहिल्या कोरोनाच्या लाटेपासून असलेला टास्क फोर्स सर्वांनीच शाळा-कॉलेज सुरु करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची बैठक होणार आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं टोपे म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राज्यात आता निर्बंधांबाबत शिथिलता देण्याचा महत्वापूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्स 15 ऑगस्टपासून रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू असणार आहे, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली जरी ज्या दिवशी राज्याची ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रीक टनच्या वर पोहोचेल तेव्हा राज्यात लगेच कडक लॉकडाऊन जारी केला जाईल असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.

*  दोन डोस घेतलेल्यांना परवानगी

राज्यातील शॉपिंग मॉल्सला रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्समध्ये कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेशाची परवागनी देण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. लग्नकार्यासाठी खुल्या जागेवर 200 माणसांना तर बंद हॉलमध्ये निम्म्या क्षमतेच्या किंवा 100 माणसांपर्यंत उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय देखील 15 ऑगस्टपासून लागू होणार आहे, असं टोपे यांनी सागितलं आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #State #Restrictions #relaxed #demand #oxygen #immediate #lockdown, #राज्यातील #निर्बंध #शिथिल #ऑक्सिजन #मागणी #700मेट्रीकटन #कडकलॉकडाऊन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नाशिक : लाचेच्या चौकशीनंतर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर – वीर फरार
Next Article स्वातंत्र्य सैनिक देवई चव्हाण यांचे निधन

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?