Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आमिर खानने केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

आमिर खानने केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

Surajya Digital
Last updated: 2023/03/13 at 10:48 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
》 पानी फाऊंडेशनने शेती क्षेत्रात क्रांती आणली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 पानी फाउंडेशन आयाेजित राज्यस्तरीय फार्मर कप स्पधेतील विजेत्यांची नावे

》 पानी फाऊंडेशनने शेती क्षेत्रात क्रांती आणली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणे : आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनची कल्पना मांडली. इतकेच नव्हे तर पाणी फाऊंडेशनने सातत्य दाखवत जलसंधारण अणि शेतकऱ्यांना समर्थ करण्याचे कार्य केले आहे.  Aamir Khan praised Deputy Chief Minister Devendra Fadnavis for Pani Foundation’s agriculture revolution आधी वॉटर कपच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गावे तयार केली. आता फार्मर कप च्या माध्यमातून विषमुक्त शेती आणि शेतकऱ्यांचे गट तयार करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचे सुंदर मॉडेल तयार केले आहे. पानी फाऊंडेशनने शेती क्षेत्रात क्रांती आणली असल्याचे गाैराेवदगार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

 

पानी फाऊंडेशनतर्फे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ‘सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’ च्या पुरस्कार वितरणाचा शानदार साेहळा रविवारी पार पडला. त्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला पानी फाऊंडेशनचे संस्थापक आमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, पदमश्री पाेपटरावर पवार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, दिग्दर्शक आशुताेष गाेवारीकर, अभिनेते अतुल कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याच्या सर्वच जिल्हयांतून हजाराे शेतकरी गट, शेतकरी महिला गट उपस्थित हाेते. या कार्यक्रमात पानी फाउंडेशनचा राज्यस्तरीय फार्मर कप २०२२ हा प्रथम पुरस्कार अमरावतीच्या परिवर्तन शेतकरी गटाला देण्यात आला.

 

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वातावरण बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत अवर्षण, अतिवृष्टीच्या फेऱ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शाश्वत शेतीला पर्याय नाही आणि त्यासाठी विषमुक्त, नैसर्गिक शेतीकडे जावे लागेल. उत्पादन खर्च कमी करून जमिनीचा पोत सुधारावा लागेल. या सर्व गोष्टी आपण नैसर्गिक शेतीद्वारे करू शकतो. राज्यात कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला. म्हणून आपल्याला नैसर्गिक शेतीकडे यावे लागेल. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात शेतक-यांसाठी आणलेल्या याेजनांचाही उल्लेख केला.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

आमिर खान म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानी फाऊंडेशनच्या प्रवासात नेहमीच सहकार्य केले. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून दिलेल्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले. शेतकऱ्यांनी गट तयार करून आपल्या क्षमता वाढवाव्यात. वैज्ञानिक आणि संशोधकांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करून पुढे जावे. येत्या काळात महाराष्ट्रात आणि भारतात हजारो कृषी उद्योजक तयार व्हावेत. शेतीला व्यवसायाच्यादृष्टीने पाहून नवतरुणांनी शेतीकडे वळावे, यातील समस्यांवर मात करून पुढे जावे. यावेळी सत्यजित भटकळ आणि पोळ यांनी पानी फाऊंडेशनच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

 

या कार्यक्रमाला भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, कृषी सचिव एकनाथ डवले. अभिनेते अतुल कुलकर्णी, सहयाद्री ॲग्राे फार्मचे विकास शिंदे, राहूरी कृषी विदयापीठाचे कुलगूरू डाॅ. प्रशांत पाटील, पंजाबराव कृषी विद्यपीठाचे  कुलगुरू डॉ . शरद गडाख आदी उपस्थित हाेते. यावेळी ध्वनीचित्रफीत आणि शाहीर अवधूत गांधी, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांच्या पथकाने सादर केलेल्या नृत्याविष्काराच्या माध्यमातून पानी फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देण्यात आली. नीरज नारकर व स्पृहा जाेशी यांनी सुत्रसंचालन केले.

 

》 पानी फाउंडेशन आयाेजित राज्यस्तरीय फार्मर कप स्पधेतील विजेत्यांची नावे

प्रथम पुरस्कार- परिवर्तन शेतकरी गट, वाठाेडा, ता. वरुड , जि. अमरावती, रक्कम २५ लाख
द्वितीय पुरस्कार- चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट, गाेळेगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद, रक्कम १५ लाख रूपये
संयुक्त तृतीय पुरस्कार – जय याेगेश्वर शेतकरी गट , डांगर बुद्रूक, ता. अंमळनेर, जळगाव , रक्कम ५ लाख रुपये
संयुक्त तृतीय पुरस्कार – उन्नती शेतकरी गट, वारंगा तर्फे नांदापूर , ता. कळमनुरी, जि. हिंगाेली, रक्कम ५ लाख रुपये

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #AamirKhan #praised #DeputyChiefMinister #DevendraFadnavis #PaniFoundation's #agriculture #revolution, #आमिरखान #उपमुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस #कौतुक #पानीफाऊंडेशन #शेती #क्रांती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुलीच्या लग्नासाठी पूजा करावी लागेल, महिलेची केली फसवणूक
Next Article भारतीय सिनेमाचा विजय; भारताला एकाच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?