Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धुराडे पेटवण्यासाठी कारखाने सज्ज मात्र मागील एफआरपीचे 203 कोटी थकित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

धुराडे पेटवण्यासाठी कारखाने सज्ज मात्र मागील एफआरपीचे 203 कोटी थकित

Surajya Digital
Last updated: 2022/09/15 at 12:39 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ १४ दिवसात बिल आदा करणे बंधनकारक□ विलंब झाल्यास व्याजासह एफआरपी देण्याची तरतूद ; मात्र कोण दाखल करणार गुन्हास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ अर्धवट एफआरपी दिलेले कारखाने

□ १४ दिवसात बिल आदा करणे बंधनकारक

□ विलंब झाल्यास व्याजासह एफआरपी देण्याची तरतूद ; मात्र कोण दाखल करणार गुन्हा

सोलापूर – चालू वर्षीचा गळीत हंगाम उंबरठ्यावर आला असून जिल्ह्यात बहुतांश साखर कारखान्याने धुराडे पेटविण्यासाठी सज्ज झाले असले तरी गेल्या हंगामातील ३१ आँगस्टपर्यंत २०३ कोटी रूपये थकित असून एफआरपी दिल्याशिवाय गाळप परवाना न देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे. Sugar mills ready to set fire to Dhurade, but Solapur owes 203 crores of previous FRP

ऊसाचे वाढते क्षेत्र पाहता व गेल्यावर्षी ऊस गाळपास उशीर झाल्यांने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.याचा विचार करता १ आँक्टोबर पासून गाळप हंगाम सुरु होणार असल्याचे सहकार मंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र जिल्ह्यातील साखर कारखानदार थकित एफआरपी दिवाळी पुर्वी दिली जाईल असे सांगत आहेत.

मात्र यंदा दिवाळी २० आँक्टोबर नंतर आहे.तत्पूर्वी तीन आठवडे आदीच गाळप हंगाम सुरू होत आहे. तर एफआरपी दिल्याशिवाय गाळप परवाना दिला जाणार नाही असे साखर आयुक्तांचे धोरण आहे.त्यामुळे १ आँक्टोबरला साखर कारखाना सुरू करायचा झाल्यास त्या अगोदर थकित एफआरपी द्यावी लागणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

गतवर्षीच्या गाळप हंगामात जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केला. आता यंदाचा हंगाम तोंडावर असतानाही त्यापैकी १८ कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांची पूर्णपणे एफआरपी दिलेली नाही. या कारखान्यांनी शेतकऱ्यांची सुमारे २०३ कोटी रुपयांची एफआरपी थकविली आहे.

 

जिल्ह्यात जवळपास ३६ साखर कारखाने आहेत. गतवर्षी त्यापैकी ३४ साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप केले. हा गाळप हंगाम पूर्ण होऊन आता तीन महिने झाले आहेत. तरीही शेतकऱ्यांना पूर्णपणे पैसे मिळालेले नाहीत. कायद्यानुसार गाळपानंतर १४ दिवसांच्या आत पूर्णपणे एफआरपी देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. पण कारखान्यांनी हा कायदा पायदळी तुडवला आहे. अनेक कारखान्यांनी तरी दिलेले पैसेही तुकड्या – तुकड्यांनी दिले आहेत. तसेच विलंबाने मिळणारी एफआरपी कारखान्यांनी व्याजासह द्यावी, अशी तरतूद कायद्यात आहे. पण त्याचेही पालन होत नाही. प्रशासनही यावर गप्पच आहे. पण शेतकरी मात्र कारखान्यांकडे हेलपाटे मारत आहेत.

 

□ अर्धवट एफआरपी दिलेले कारखाने

गतवर्षीच्या एफआरपीची रक्कम अर्धवट दिलेल्या कारखान्यात ३१ ऑगस्टच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील पांडुरंग (माळशिरस), श्री सिद्धेश्वर (सोलापूर), संत दामाजी (मंगळवेढा), श्री विठ्ठलराव शिंदे (माढा), मकाई (करमाळा), संत कुर्मदास (माढा), दी सासवड माळी शुगर (माळशिरस), विठ्ठल कॅार्पोरेशन (माढा), इंद्रेश्वर शुगर (बार्शी), युटोपियन शुगर (मंगळवेढा), सहकार शिरोमणी (पंढरपूर), मातोश्री शुगर (अक्कलकोट), भीमा शुगर (मोहोळ), धाराशिव युनिट चार (सांगोला) आणि शंकर साखर कारखाना (माळशिरस) या प्रमुख कारखान्यांसह १८ कारखान्यांचा समावेश आहे.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #Sugar #mills #ready #set #fire #Dhurade #Solapur #owes #203crores #previous #FRP, #धुराडे #पेटवणे #साखर #कारखाने #सज्ज #एफआरपी #२०३कोटी #थकित #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव मंगळवेढ्याच्या महाविद्यालयात होणार!
Next Article जुन्या वादातून पोलीस हेडक्वार्टरमध्ये घुसून पोलिसाचा खून

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?