Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहाटे पाचला तुम्हाला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटला होता; कुणी किती भूखंड घेतले दाखवेन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

पहाटे पाचला तुम्हाला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटला होता; कुणी किती भूखंड घेतले दाखवेन

Surajya Digital
Last updated: 2020/10/23 at 6:26 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई :  मला सांगतात, नाथाभाऊ तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. चार दिवस ज्यांना भाजपात येऊन झाले नाहीत असे लोक म्हणतात मार्गदर्शन करा. मी राष्ट्रवादीत जाणार तर बोंबाबोंब झाली. मग तुम्ही सकाळी पाच वाजता शपथ घेतली तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी पक्षच चांगला वाटला ना? पहाटे पाचला जसा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगला वाटला होता त्यापेक्षा मला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटतो आहे ना.. म्हणून मी आलो राष्ट्रवादीत असं म्हणत पहाटेच्या शपथविधीवरही खडसेंनी टीका केली. आज राष्ट्रवादीत आल्याने मला माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं आहे असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रवेश सोहळ्यात खडसे यांचे धडाकेबाज भाषण झाले. यावेळी खडसे यांनी भाजपच्या बदललेल्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख टाळताना खडसे यांनी थेट आव्हान दिले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

माझ्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. अँटी करप्शन विभागाची चौकशी लावण्यात आली. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मला छळलं गेलं. आता थोडे दिवस जाऊ द्या. खरं काय ते मी तुम्हाला सांगेन. कुणी किती भूखंड घेतले ते मी दाखवेन. नियमाच्या बाहेर जाऊन जर कुणी काही केले असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, असे माझे मत असून तशी मागणी मी आता सरकारकडे करणार आहे’, असे नमूद करत आधीच्या सरकारच्या काळातील भूखंड घोटाळे बाहेर काढण्याचे स्पष्ट संकेतच एकनाथ खडसे यांनी दिले.

* आयुष्यातील चार वर्षे वाया गेली

भाजपच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर खडसे यांनी सडकून टीका केली. गेले चार वर्षे मी अन्याय सहन केला. माझ्यावरील अन्याय दूर होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. आता तर पक्षात येऊन चार दिवस झाले नाहीत तेसुद्धा मला सल्ले देऊ लागले होते. केवळ ज्येष्ठ म्हणत राहिले आणि मला अडगळीत टाकले गेले, अशी मनातील सलच खडसे यांनी बोलून दाखवली.

* राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिल्लीतूनच

राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याबद्दल शरद पवार व जयंत पाटील यांचे आभार मानताना मला राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिल्लीतील काही भाजप नेत्यांनीच दिला होता, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी केला. भाजपात तुम्हाला यापुढे काही भवितव्य नाही, असे मला या नेत्यांनी सांगितल्याचा दावाही खडसे यांनी केला. माझ्या आयुष्यातील चार वर्षे वाया गेली. कदाचित राष्ट्रवादीत प्रवेश मिळाला नसता तर कायमचा घरीच बसलो असतो, असेही खडसे म्हणाले. भाजप सोडण्याची माजी अजिबात इच्छा नव्हती. मात्र कार्यकर्त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून माझ्याकडे तसा आग्रह धरला होता. कार्यकर्त्यांच्या इच्छेपोटीच आज मी राष्ट्रवादीत जात आहे. राष्ट्रवादीत जात असताना कोणत्याही पदाची मी अपेक्षा केलेली नाही. ज्या निष्ठेने भाजपात काम केले त्याच निष्ठेने मी राष्ट्रवादीत काम करणार आहे. पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेणार आहे, असा विश्वास खडसे यांनी पवारांना दिला.

* फडणवीसांना टोला

मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही.  ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिलं पक्षाने? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तोंडावर गोड बोलायचं आणि पाठीमागे कारवाया करत रहायचं हे मी कधी केलं नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टोला लगावला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी हा आरोप केला आहे.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #एकनाथखडसे #धडाकेबाज #भाषण #पहाटेपाचला #राष्ट्रवादीपक्ष #चांगला #वाटतो
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आपत्तीग्रस्तांना १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा; दिवाळीपर्यंत मदत मिळणार
Next Article दोन वाजताचा पक्षप्रवेश चारपर्यंत का लांबला जयंत पाटलांनी सांगावे : पाटील

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?