Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार

admin
Last updated: 2025/09/18 at 6:06 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : संपूर्ण देशात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण होणार आहे. या प्रक्रियेमुळे 50 कोटींपेक्षा अधिक मतदारांना कोणतेही अतिरिक्त कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांची नावे आधीच मतदार यादीत नोंदलेली आहेत.

या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर, 50 कोटींपेक्षा अधिक मतदारांना कोणतेही अतिरिक्त कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही. याचे कारण म्हणजे, या मतदारांची नावे आधीपासूनच मतदार यादीत समाविष्ट आहेत. देशात 1 जुलै 1987 पूर्वी जन्म झाल्याचा जाहीरनामा (सेल्फ डिक्लेरेशन) देणाऱ्या मतदारांना देखील कोणतेही इतर पुरावे द्यावे लागणार नाहीत.

भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या मते, देशातील निम्म्याहून अधिक मतदार या नव्या प्रक्रियेच्या कार्यक्षेत्रात येतील. या मतदारांना कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांची नावे त्यांच्या राज्यात पूर्वी झालेल्या एसआयआरच्या यादीत आधीच समाविष्ट आहेत. बहुतेक राज्यांमध्ये शेवटचा विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2008 या कालावधीत झाला होता आणि तोच या प्रक्रियेसाठी ‘कट-ऑफ’ मानला जाणार आहे.

बिहारमध्ये शेवटचा एसायआर 2003 मध्ये झाला होता. त्यानुसार, सध्या यादीत असलेल्या एकूण मतदारांपैकी 60 टक्के म्हणजे सुमारे 4.96 कोटी मतदारांना आपली जन्मतारीख किंवा जन्मस्थान सिद्ध करण्यासाठी कोणतेही सहायक कागदपत्र देण्याची गरज नाही. केवळ मतदार यादीतील संबंधित भाग वापरण्यात येईल. बिहारमध्ये या प्रक्रियेवरून राजकीय वादही झाला आहे, जिथे विरोधी पक्षांनी कागदपत्रांच्या अभावामुळे लोकांचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली होती.

फक्त 40 टक्के मतदारांनाच त्यांच्या जन्मतारीख किंवा जन्मस्थानाची पुष्टी करण्यासाठी यादीतील 12 मान्य कागदपत्रांपैकी कोणतेही एक सादर करावे लागेल. याशिवाय, नवीन मतदार होणारे किंवा राज्याबाहेरून येणाऱ्या काही अर्जदारांसाठी एक अतिरिक्त ‘घोषणापत्र’ सुरू करण्यात आले आहे. अशा व्यक्तींनी भारतात 1 जुलै 1987 पूर्वी जन्म झाल्याची शपथ द्यावी लागेल असे निवडणूक आयोगातील सूत्रांनी स्पष्ट केले.

You Might Also Like

तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी

ट्रम्प यांनी अँटीफा या संघटनेला “प्रमुख दहशतवादी संघटना” म्हणून केले जाहीर

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ढगफुटी; सात जण बेपत्ता तर दोघांची सुटका

निवडणूक आयोगाची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

कॅनडात खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
Next Article मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
ट्रम्प यांनी अँटीफा या संघटनेला “प्रमुख दहशतवादी संघटना” म्हणून केले जाहीर
देश - विदेश September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?