Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: निवडणूक आयोगाची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

निवडणूक आयोगाची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

admin
Last updated: 2025/09/17 at 6:39 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली,17 सप्टेंबर : भारत निवडणूक आयोगाने (ईसीआय) आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) वापरण्याबाबत नव्या मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा केली आहे. यानुसार, यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएमवरील मतपत्रांवर उमेदवारांचे रंगीत फोटो छापले जाणार आहेत. ही प्रणाली देशात प्रथमच बिहारमध्ये अमलात येणार असून, मतदारांना उमेदवारांची ओळख पटवण्यात अधिक सुलभता मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

निवडणूक आयोगाने निवडणूक संचालन नियम, 1961 मधील नियम 49बी अंतर्गत सुधारणा करत मतपत्र अधिक स्पष्ट, सुबोध आणि वाचनीय करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या प्रणालीत खालील महत्त्वाच्या बाबी अंतर्भूत आहेत:

  1. उमेदवारांचे रंगीत फोटो : ईव्हीएमवरील मतपत्रात उमेदवारांचा चेहरा फोटोच्या तीन-चतुर्थांश भागात असलेला असेल, जेणेकरून ओळख अधिक स्पष्ट होईल.

  2. क्रमांक आणि नावाचे सादरीकरण : सर्व उमेदवारांचे किंवा नोटा (कोणताही उमेदवार नाही) यांचे क्रमांक आंतरराष्ट्रीय भारतीय अंकपद्धतीत, 30 फॉन्ट साइजमध्ये बोल्ड अक्षरांत छापले जातील. तसेच सर्व नावे एकाच फॉन्ट आणि वाचण्यास सोप्या आकारात असतील.

  3. कागदाचा दर्जा : मतपत्र 70 जीएसएम दर्जाच्या कागदावर छापले जाणार असून, विधानसभा निवडणुकीसाठी खास गुलाबी रंगाच्या कागदाचा वापर केला जाणार आहे, ज्यामध्ये विशिष्ट आरजीबी रंगमान वापरले जातील.

  4. ईव्हीएमचा अपग्रेडेड अवतार : या नव्या तंत्रज्ञानाचा वापर बिहारपासून सुरू होत असून, पुढील सर्व निवडणुकांमध्ये हे सुधारित ईव्हीएम मतपत्र वापरण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने यापूर्वीही गेल्या 6 महिन्यांत निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुटसुटीत आणि मतदार हितासाठी सुलभ करण्यासाठी एकूण 28 सुधारणा केल्या आहेत. ईव्हीएममधील हे नवे बदल त्याच सुधारणांच्या पुढील टप्प्याचा भाग आहेत.

You Might Also Like

निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार

तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी

ट्रम्प यांनी अँटीफा या संघटनेला “प्रमुख दहशतवादी संघटना” म्हणून केले जाहीर

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ढगफुटी; सात जण बेपत्ता तर दोघांची सुटका

कॅनडात खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज ठाकरेंची अमित शाह-जय शाह यांच्यावर व्यंगचित्रातून टीका
Next Article शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना – गोपीचंद पडळकर

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?