Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाचा संवाद उपक्रम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाचा संवाद उपक्रम

admin
Last updated: 2025/04/01 at 5:17 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेससह इतर विरोधी पक्ष वारंवार निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने संवाद उपक्रम राबवला आहे. या अंतर्गत देशभरात निवडणूक आयोगाने 4719 बैठका घेतल्या असून 28 हजार प्रतिनिधींशी चर्चा केली आहे.

या बैठकांच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या प्रलंबित समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या बैठकांस देशभरातील सर्व मतदारसंघांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये राजकीय पक्षांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने निवेदन जारी करुन दिली आहे. देशभरातील मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ), जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ) आणि मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) स्तरावर 31 मार्च 2025 पर्यंत 25 दिवसांत या बैठका झाल्या आहेत. यामधील 40 बैठका सीईओ स्तरावर, 800 डीईओ स्तरावर आणि 3879 बैठका ईआरओ स्तरावर आयोजित करण्यात आल्या होत्या. या संवादात 28 हजारहून अधिक राजकीय पक्ष प्रतिनिधी सहभागी झाले, असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

दरम्यान, 4 आणि 5 मार्च रोजी दिल्लीमध्ये देशभरातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद झाली होती. या परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना राजकीय पक्षांसोबत संवाद वाढवण्याचे आणि त्यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्याचे निर्देश सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार देशभरात या बैठका घेण्यात आल्या आहेत. ईआरओ, डीईओ किंवा सीईओ स्तरावर प्रलंबित समस्या संबंधित अधिकारी भारतीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि कायदेशीर चौकटीत राहून सोडवतील, असे निवडणूक आयोगाने म्हटले. यासंबंधी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सीईओंकडून अहवाल मागविण्यात आला आहे. जर एखादा मुद्दा अस्तित्वात असलेल्या कायदेशीर चौकटीत सोडवता आला नाही, तर तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल.

You Might Also Like

शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय

भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरू

नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करा – खा. भागवत कराड

देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये ४४ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

कुलगाममध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘माझी कन्या’ ला 75 लाखांचा धनलाभ; ३०० मुलींच्या नावे होणार फिस डिपॉजिट
Next Article डिजीटल व्यवहारांत जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा – राष्ट्रपती

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?