Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतक-यांचे वीजबिल कारखान्याच्या उसबिलातून वसूल करण्याचा प्रस्ताव, भाजप झाली आक्रमक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवारसोलापूर

शेतक-यांचे वीजबिल कारखान्याच्या उसबिलातून वसूल करण्याचा प्रस्ताव, भाजप झाली आक्रमक

Surajya Digital
Last updated: 2021/10/30 at 6:22 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई / सोलापूर : शेतकऱ्यांच्या मोटारीचे वीज बिल कारखान्यांकडे असलेल्या ऊस बिलाच्या माध्यमातून वसूल करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी पुण्यात साखर संचालकांसोबत वीज वितरण कंपनीच्या आधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीचा प्रस्ताव समाजमाध्यमामधून बाहेर पडताच या वसुली मोहिमेला भाजपाकडून कडाडून विरोध होत आहे.

साखर संचालक शेखर गायकवाड यांच्या कार्यालयाकडून सर्व साखर कारखान्यांना या संदर्भातील पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार आज दुपारी चार वाजता ही ‘ऑनलाइन’ बैठक होती. दरम्यान, बैठकीआधीच ही बातमी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरल्याने राज्य सरकार व महावितरणच्या या कृतीला जोरदार विरोध सुरू झाला आहे.

शेतकऱ्यांनीही दुपारपासून राज्य सरकार व महावितरण यांच्यावर जोरदार टीका सुरु केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही वसुली योजना महावितरणने आखली असून राज्य सरकारच्या साखर संचालकांमार्फत अमंलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिक नैसर्गिक संकटामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासादेण्याऐवजी त्यांना त्रास देण्याचा उद्योग राज्य सरकारकडून केला जात असल्याचे या प्रस्तावावरुन दिसून आले आहे.

शेतकऱ्याला खिंडीत गाठून वसुली करायचा राज्य शासनाचा प्रयत्नाचा भाजपकडून निषेध केला जात आहे.शेतकऱ्याचं वीजबील उसाच्या बिलातूनच कापून घ्यायचा निर्णय हा अतिशय चुकीचा आणि जुलमी होईल. साखर आयुक्तांनी पुणे,सांगली,सातारा,कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाना प्रशासनाची ऑनलाईन बैठक बोलवली आहे. शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याला खिंडीत गाठून वसुली करायचा या सरकारचा निर्णय हा अतिशय जुलमी आणि अत्याचारी आहे. मी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करतो, असे आमदार राम सातपुते, (माळशिरस ) यांनी सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या बिलातून तुम्हाला वीजबिलांची थकबाकी वसूल करता येणार नाही. आज शेतकरी संकटात असताना त्यांना वीजबिलात सूट दिली पाहिजे. वीजबिल माफ केले पाहिजे. अशावेळी जुलमी पद्धतीने शेतकऱ्यांच्या वीजबिलातून थकबाकी कापता येणार नाही. असे केल्यास आम्ही उग्र आंदोलन करू, असे प्रवीण दरेकर ( विधानपरिषद विरोधी पक्षनेते) यांनी ठणकावून सांगितले आहे.

* संघर्ष अटळ आहे – राजू शेट्टी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून वीज बिलं वसूल करण्यासंदर्भातील आदेश साखर आयुक्तांनी दिले होते. राजू शेट्टींनी त्या आदेशावरुन साखर आयुक्तांवर टीकास्त्र सोडलंय. कोणत्या कायद्यानुसार ही वसुली करण्याचे आदेश दिलेत हे साखर आयुक्तांनी स्पष्ट करावं, असा सवाल शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय. हा केवळ सरकारच्या दबावामुळे आदेश काढला असून, जर हा आदेश मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

* साखरेचे एक पोतेही बाहेर पडू देणार नाही – आमदार कल्याणशेट्टी

हा प्रस्ताव शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून तो तातडीने कार्यवाही करण्यापासून थांबवावे, असे निवेदन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे. कल्याणशेट्टी म्हणाले की, मागील दोन वर्षापासून अतिवृष्टी होत आहे. तसेच शेतकरी वारंवार कोणत्या ना कोणत्या अडचणीतून जात आहे. शासनाने कोणतीही मदत शेतकऱ्यांना केलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी रहाणे गरजेचे आहे.

अगोदरच साखर कारखान्याचे ऊस बील हे वर्ष वर्ष देत नाहीत. त्यातून शेतकऱ्यांनी बँक, वित्तीय संस्था व सावकारी कर्ज काढलेले आहे आणि त्याच्या व्याजाचा भुर्दंड वाढत आहे. अशा परिस्थितीमधे साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वीज बील, ऊस बीलातून सक्तीने वसूल करण्याची कार्यवाही होवू नये, अशी विनंती आहे. याउपरही जे कारखाने शेतकऱ्यांच्या ऊस बीलातून, वीज बील देयके कपात केले तर अशा साखर कारखान्याच्या गोडावूनमधून आम्ही साखरेचे एक पोतेही बाहेर पडू देणार नाही, याची नोंद घ्यावी, असा इशारा दिला आहे.

You Might Also Like

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

TAGGED: #BJP #aggressive #proposing #recover #farmers #Electricitybills #factory #utilities, #शेतकरी #वीजबिल #कारखाना #उसबिल #वसूल #प्रस्ताव #भाजप #आक्रमक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लसीकरण कमी झाल्यास गावचे सरपंच पद धोक्यात, या कलमानुसार काढला आदेश
Next Article कोरोनाने निधन झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 25 हजार रुपये

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?