Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आता देशात वीज महागणार, फाटक्या खिशाला बसणार झळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

आता देशात वीज महागणार, फाटक्या खिशाला बसणार झळ

Surajya Digital
Last updated: 2021/11/18 at 7:52 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

नवी दिल्ली : देशभरातील जनता महागाईने हैराण झाली आहे. अशातच आता विजेचे दरही वाढणार आहेत. देशातील कोळशाचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्र सरकारने नवा नियम लागू केला आहे. ऑटोमॅटिक पासथ्रू मॉडेल अंतर्गत, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे राज्य वीज वितरण कंपन्यांना (डिस्कॉम) वीज खरेदी करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

याची सुरुवात राजस्थानमध्ये सुरु झाली आहे. राज्यातील जयपूर, जोधपूर आणि अजमेर या तीन शहरांमध्ये डिस्कॉम कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांवर प्रति युनिट 33 पैसे इंधन अधिभार लावलाय. त्यामुळे पुढील तीन महिन्यांसाठी राज्यातील सर्व श्रेणीतील ग्राहकांच्या वीजबिलात वाढ होणार आहे. देशातील इतर राज्येही लवकरच इंधन अधिभार लावून वीजवाढ करू शकतात.

देशातील सर्व राज्यांतील डिस्कॉम्स आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून दिलासा मिळण्याची आशाच शिल्लक नाही. यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात उत्पादित होणारी 60 टक्के वीज जीवाश्म इंधनापासून तयार होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अशा परिस्थितीत जर एखाद्या राज्याने विजेच्या दरात वाढ केली. त्याचेच इतर राज्येही अनुकरण करुन दरात वाढ करतील. थोडक्यात येत्या काही दिवसांत वीजबिल वाढण्याचा तोटा असून सर्वसामान्याच्या फाटक्या खिशाला झळ बसणार आहे. आधीच कोरोनामधील लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसलाय, त्यात महागाईची भर पडली. यामुळे खिसा राहिलाच नाही. खिसा पूर्ण फाटला आहे, अशात याच फाटक्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.

वीजनिर्मिती कंपन्यांसोबतच वितरण कंपन्यांनाही मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे देशातील ऊर्जा क्षेत्रावर मोठे संकट आले आहे. देशात सौरऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आलीय, परंतु आता भारतातील ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत कोळसा हा आहे. देशातील त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशाची मोठ्या प्रमाणावर देशाला आयात करावी लागत आहे.

या परिस्थितीत जेव्हा जगात इंधनाचे दर वाढतील, तेव्हा ऊर्जा उत्पादक कंपन्यांचा खर्चही वाढणार आहे. यामुळे ग्राहकांसाठी विजेचा दर वाढवून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्वयंचलित पासथ्रू मॉडेलचा शस्त्रासारखा वापर करून या कंपन्या राज्यांना महागडी वीज विकणार आहेत. यानंतर डिस्कॉम्सही वीज दर वाढवतील.

You Might Also Like

विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री

अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी

अमेरिका : ग्लोबल टेरिफच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द

ट्रम्प यांच्यावर केलेल्या पोस्टबद्दल मस्क यांच्याकडून खेद व्यक्त

पाकिस्तान सैन्य आणि बलूच बंडखोरांमधील झटापटीत पाकचे २३, बलूच आर्मीचे ९ जवान ठार

TAGGED: #electricity #become #more #expensive #country, #देशात #वीज #महागणार #फाटक्या #खिशाला #झळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी उपसभापतीच्या घरासमोरुन दुचाकीची चोरी, बसमधील महिला प्रवाशीचे पाच लाखांचे दागिने लंपास
Next Article उद्या 580 वर्षातील सर्वात मोठे खंडग्रास चंद्रग्रहण, वर्षातील शेवटचे ग्रहण

Latest News

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक
महाराष्ट्र June 12, 2025
एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे
महाराष्ट्र June 12, 2025
एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख
महाराष्ट्र June 12, 2025
विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री
देश - विदेश June 12, 2025
अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी
देश - विदेश June 12, 2025
शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी
महाराष्ट्र June 12, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?