Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्राच्या कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशशिवार

केंद्राच्या कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

Surajya Digital
Last updated: 2020/09/28 at 7:56 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या विधेयकांचे रुपांत अखेर कायद्यात झाले आहे. परंतु या कृषी कायद्यास देशभरातून होणारा विरोध कायम आहे. अशातच आता केरळ काँग्रेस खासदार टी.एन. प्रतापन यांनी कृषी कायदा 2020 विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. केंद्राने संमत केलेल्या तीन्ही कृषी विधेयकांच्या वैधानिकतेवरच प्रश्नचिन्ह उत्पन्न करत टी.एन. प्रतापन यांनी याचिका दाखल केली आहे.

टी.एन. प्रतापन यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, संसदेत मंजूरी मिळालेल्या शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती)2020 ही तीनही विधेयके भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14,15, आणि 21 च्या विरोधात आहेत. या अनुच्छेदाचे उल्लंघन करणारी आहेत.

याचिकेमध्ये असेही म्हटले आहे की, कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) नसेल तर सर्वासामान्य शेतकरी संरक्षणहीन होतील. हे शेतकरी बाजारात असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि कॉर्पोरेट घराण्यांचे भक्ष्य बनतील. आंतरराष्ट्रीय कंपन्या अधिक लाभ मिळवू इच्छितात त्यांना गरीबांची काहीही पर्वा नाही. जो शेतकरी आपल्या दैनंदिन गरजा आणि जीवन यासाठी शेतीवर अवलंबून असतो. त्याच्याशी या कंपन्यांना काहीही देणंघेणं नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अधिवक्ता जेम्स पी. थॉमस यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, एपीएमसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबविण्यास मदत होते. एपीएमसी हे निश्चित करते की, काहीही झाले तरी शेतकरी शेतकरी बाजारपेठेतून रिकाम्या हाती परतत नाही.

याचिकेमध्ये पुढे म्हटले आहे की, या विधेयकांमध्ये देण्यात आलेल्या समझोत्यांनुसार शेतकरी आपल्या पिकाला योग्य तो भाव मिळवू शकत नाहीत. याचिकाकर्त्याने कोर्टाकडे मागणी केली आहे की, शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) 2020 ही तीनही विधेयके शेतकरी संरक्षण आणि कृषी सेवा कायदा कलम 2, 3, 4, 5, 6, 7, 13, 14, 18 आणि 19 अन्वये अवैध ठरविण्यात यावीत.

You Might Also Like

राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट

चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे

शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

जम्मू-काश्मीर: कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

TAGGED: #केंद्रसरकार #कृषीविधेयक #काँग्रेस #सर्वोच्च #सुप्रिम #कोर्ट #न्यायालय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोना बाधित रुग्णाची सरकारी रुग्णालयात आत्महत्या; वडिलांच्या हत्येबद्दल संशय
Next Article तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?