तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली.
वर्ध्यात सापडले मुघलकालीन चार किलो सोने https://t.co/39xtai7BsZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
शेतकरी माणिक लक्ष्मण गायकवाड वय ( 71ता. तुळजापूर , पांगरदरवाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. हे काल मंगळवारी (11 मे ) सकाळी साडे-अकरा वाजण्याच्या सुमारास जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी शेतात गेले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आमदार प्रणिती शिंदे यांनी गरजूंसाठी स्वत: लाटल्या पोळ्या https://t.co/IlIlYuYqIz
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
यावेळी विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा पायरीवरुन तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यु झाला.
मयत शेतकऱ्याचे पुतणे गणेश हरिदास गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तामलवाडी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मयत शेतकरी माणिक गायकवाड यांच्या पश्चात, पत्नी, दोन भाऊ, पाच मुली, एक मुलगा, सुना नातवंडे असा परिवार आहे.
भारतात लवकरच लहान मुलांना कोरोना लस https://t.co/xQTCxVS2pR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021