Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अनेक संकटे झेलत शेतकऱ्यांनी केली मशागतीला सुरुवात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अनेक संकटे झेलत शेतकऱ्यांनी केली मशागतीला सुरुवात

admin
Last updated: 2025/06/15 at 3:28 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 15 जून (हिं.स.)

दिवसभर काळ्या मातीत राबराब राबणे, हे बळीराजाच्या आयुष्यालाच लागले आहे. जगाचा पोशिंदा कुटुंबासह शेतात कायम घाम गाळीत आला आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला बरसलेल्या पावसाने बळीराजा नव्या उमेदीने कामाला लागला आहे. लाखनी तालुक्यातील किटाडी येथील कोरडवाहू शेतशिवारात खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामात बळीराजा व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

निसर्गही साथ देत नाही. मात्र, नैसर्गिक आपत्ती झेलत निसर्गाच्या आशेवर वार्षिक अंदाज बांधत नियोजन करणारा बळीराजा यंदा तरी शेतातून भरघोस उत्पन्न पदरी पडेल या आशेवर खरिपातील पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेण्याच्या घाईत दिसत आहे. वाढत्या महागाईचे चटके सहन करीत ऊन-पावसाची पर्वा न करता बळीराजा आपल्या कारभारणीसह शेतात कामे करीत आहे. निसर्गाच्या भरवशावर लाखो रुपयांचा सट्टा खेळणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने साथ दिली, तर आपले दारिद्रय दूर होईल, अशी अपेक्षा आहे. शेतीकामांना सुरुवात झाल्याने शेतमजुरांना रोजगार मिळू लागला आहे. शेतशिवार शेतकरी व मजुरांनी फुललेले दिसत आहे. आधुनिक यांत्रिकीकरणामुळे पशुधन कमी झाले आहे.

कृषी सेवा केंद्रावरही गर्दी

मृग नक्षत्राची सुरुवातच पावसाने झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी वाढू लागली आहे. चांगल्या प्रतीच्या बियाणांना अधिक मागणी आहे.

शेतात ही कामे सुरू

उन्हाळ्याच्या उत्तरार्धात शेतात शेणखत टाकणे, केरकचरा पेटविणे, पाळे-धुरे कचरामुक्त करून नीटनेटके करणे, धुऱ्यांवरील तूर पिकांची जुनी मुळे उपटणे, धुन्ऱ्यांवर माती टाकून त्यात तीळ व तूर लावणे, यासह शेत नांगरणे, वखरणे पन्हे टाकण्यासाठी जागा तयार करणे, शेतातून जनावरांचे वैरण घरी आणणे या कामांची लगबग सुरू आहे.

आधुनिक शेतीला प्राधान्य

अलीकडे शेतीकामासाठी आधुनिक यांत्रिक साधनांचा वापर अधिकाधिक होत असल्याने बैलजोडीचे महत्त्व हळूहळू कमी होत आहे. यामुळे साहजिकच पारंपारिक लाकडी शेती अवजारे दिसेनाशी होत आहेत. परिणामी, बैलजोडीच्या धुंगूरमाळांचा आवाज लयास गेला आहे.

You Might Also Like

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन

काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मंत्रालयात अभिवादन

रेल्वे प्रकल्प मंजुरीबद्दल अशोक चव्हाणांचे पंतप्रधानांना आभार

महादेव मुंडे हत्या प्रकरण : 21 महिन्यांनंतरही आरोपी फरार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमरावती – दोन साधुंनी उडवली व्यापाऱ्याची चैन
Next Article खा. प्रणिती शिंदेचा स्वबळाचा नारा

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?