Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सरकारच्या उदासीन धोरणामुळेच शेतकरी व्हेंटिलेटरवर – तुपकर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सरकारच्या उदासीन धोरणामुळेच शेतकरी व्हेंटिलेटरवर – तुपकर

admin
Last updated: 2025/06/14 at 3:13 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 14 जून, (हिं.स.) – क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीच्या आंदोलनास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ या गावात आयोजित एल्गार परिषदेतून सुरुवात झाली. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर याच ठिकाणी एल्गार सभेला प्रारंभ झाला. या वेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

रविकांत तुपकर यांनी सरकारच्या शेतकऱ्यांबद्दलच्या धोरणावर तीव्र हल्लाबोल करताना शेतकरी व्हेंटिलेटरवर असल्याचे सभेला संबोधित करताना म्हटले. राज्यातील शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे. खुद्द एका मंत्र्यांनीही विधानसभेत हे मान्य केले आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवण्याच्या दिशेने इंग्रजांप्रमाणे दादागिरी आणि दहशतीचे राजकारण करत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कर्जमाफीचा लढा चालू ठेवू. राज्यभर कर्जमाफीचा एल्गार उभा करून सरकारला झुकवू, असे ठामपणे जाहीर करून तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनीही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी शेतकऱ्यांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला. यासाठी सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला आहे. या सभेला क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह विविध पक्षांच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. या सभेला क्रांतिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे, लक्ष्मण मोरे, गजानन सावरखे, किरण ठाकरे, सागर दुधाने, नामदेव पतंगे, चंद्रशेखर गवळी, कपिल पडघन, छोटू मुंदे, विष्णू तिरमारे, शरद बोदडे, विजय अजबले, रमाकांत मुरादे, राजू राऊत, तसेच शेतकरी संघटनेचे सीताराम कंटाळे उपस्थित होते. तुपकर व प्रहारचे बच्चू कडू यांच्या आंदोलनात आम्ही सर्वजण सामील असून, वेळ आल्यास रस्त्यावर उतरून सरकारला उत्तर देऊ, असे या वेळी उपस्थित सर्व वक्त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. या सभेचे सूत्रसंचालन संतोष सुरजुसे यांनी केले. सभेला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

संपूर्ण कर्जमाफी करा अन्यथा राज्यभरात आंदोलन या एल्गार परिषदेत शेतकऱ्यांच्या हितार्थ काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार त्वरित संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करावी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, सरसकट पीक विमा लागू करावा, सोयाबीन व कपाशी पिकांना हमीभाव द्यावा या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. यासह काही पूरक मागण्याही केल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता शासनाने केली नाही तर राज्यभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले जाणार आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अहमदाबाद विमान दुर्घटना : मृतांची संख्या २७४ वर, ढिगारा हटवण्याचे काम सुरू
Next Article शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?