Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पीक विमा कंपनीच्या गैरव्यवहारावर शेतकरी संतप्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पीक विमा कंपनीच्या गैरव्यवहारावर शेतकरी संतप्त

admin
Last updated: 2025/08/16 at 7:24 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 16 ऑगस्ट – पीकविमा योजना शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी कंपन्यांसाठी नफा कमावण्याचे साधन बनल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गतवर्षीच्या खरिपात शेतकरी हिस्सा, राज्य आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून एकूण ३३९.५६ कोटी रुपये प्रीमियम स्वरूपात विमा कंपनीकडे जमा झाले. मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान होऊनही शेतकऱ्यांना केवळ ५०.४७ कोटींचा परतावा मिळाला. यामुळे केवळ चार महिन्यांच्या खरीप हंगामात कंपनीने तब्बल २९० कोटींवर डल्ला मारल्याचा आरोप होत आहे.

Contents
२५ टक्के अग्रिमवरच बोळवणविमा योजनेची आकडेवारी (गतवर्षी)शेतकऱ्यांची थट्टा

शासनाने ‘कप अॅण्ड कॅप’ मॉडेल लागू केले असले तरी त्यावर ठोस भूमिका घेतली नाही, अशी शेतकऱ्यांची नाराजी आहे. एक रुपयात सुरू केलेल्या या योजनेत ४,७६,७४८ शेतकरी सहभागी झाले आणि ४,०९,८५१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले. खरिपात ११ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने १,७०,३५१ शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी पूर्वसूचना दिली होती. त्यापैकी १,४२,७३० शेतकऱ्यांना कंपनीने फक्त ५०.४७ कोटी रुपयांचा परतावा दिला.

२५ टक्के अग्रिमवरच बोळवण

कंपनीने सार्वत्रिक नुकसान दाखवून शेतकऱ्यांना फक्त २५ टक्के अग्रिम दिले. कापणी प्रयोगात सरासरी उत्पन्न जास्त आल्याचे कारण देत उर्वरित परतावा नाकारण्यात आला. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले.

विमा योजनेची आकडेवारी (गतवर्षी)

  • शेतकरी सहभाग: ४,७६,७४८

  • विमा संरक्षित क्षेत्र: ४,०९,८५१ हे.

  • शेतकरी हिस्सा: ४,७६,७४६ रुपये

  • राज्य शासन हिस्सा: १९७.७१ कोटी

  • केंद्र शासन हिस्सा: १४१.८० कोटी

  • एकूण प्रीमियम: ३३९.५५ कोटी

  • परतावा शेतकरी: १,४२,७३०

  • परतावा दिला: ५०.४७ कोटी

शेतकऱ्यांची थट्टा

२,६१२ शेतकऱ्यांना एक हजार रुपयांच्या आतच परतावा मिळाला. एकूण १५ लाख रुपयांची भरपाई वाटप झाली असून सरासरी ५७४ रुपये प्रत्येकाला मिळाले. अनेकांच्या खात्यात केवळ १०० ते २०० रुपये जमा झाले आहेत. शासन धोरणानुसार किमान एक हजार रुपयांचा परतावा अपेक्षित असतानाही ही रक्कम मिळालेली नाही.

You Might Also Like

मुंबई महापालिकेत भाजपाचाच झेंडा फडकणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरणात तीन आरोपी अटकेत

दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांचा भारतीय सैन्याला सलाम – मुख्यमंत्री फडणवीस

तळेगाव दशासरमध्ये घरकुल घोटाळा – १८ बोगस प्रकरणांचा पर्दाफाश

शेतकरी केंद्रबिंदू मानून शासनाची प्रगतीकडे वाटचाल – दादाजी भुसे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तळेगाव दशासरमध्ये घरकुल घोटाळा – १८ बोगस प्रकरणांचा पर्दाफाश
Next Article अलास्कामधील ट्रम्प-पुतिन भेटीचे भारताकडून स्वागत

Latest News

सोलापूर विद्यापीठ : नापास विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश
सोलापूर August 16, 2025
सोलापुरातील १३४८ सदनिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
सोलापूर August 16, 2025
चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी भारत दौऱ्यावर; सीमा वादावर होणार द्विपक्षीय चर्चा
देश - विदेश August 16, 2025
रशियाच्या सैनिकी कारखान्यात भीषण स्फोट; ११ ठार, १३० जखमी
देश - विदेश August 16, 2025
मुंबई महापालिकेत भाजपाचाच झेंडा फडकणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र August 16, 2025
पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरणात तीन आरोपी अटकेत
महाराष्ट्र August 16, 2025
बीसीसीआय करणार देशांतर्गत क्रिकेट नियमांमध्ये बदल – गंभीर दुखापतीत बदली खेळाडूला संधी
देश - विदेश August 16, 2025
दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांचा भारतीय सैन्याला सलाम – मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्र August 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?