Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळणार 36,000 रुपये पेन्शन, पण हे करावे लागेल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशशिवार

कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळणार 36,000 रुपये पेन्शन, पण हे करावे लागेल

Surajya Digital
Last updated: 2021/02/11 at 4:37 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. त्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशातून प्रीमियम कापला जाणार नाही. त्याऐवजी वार्षिक मिळणाऱ्या 6000 रुपयांमधून ते पैसे कापले जातील. यात सामील झालेल्या शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर महिना 3000 रुपये पेन्शन मिळू शकेल.

देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांचा वृद्धापकाळ मोदी सरकारनं सुरक्षित केलाय. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी  पेन्शन योजनेत नोंदणी केलीय. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील  लाभार्थ्यांना या निवृत्तीवेतनाचा लाभ घेणे फायदेशीर ठरणार आहे. कारण त्यांच्यासाठी ते विनामूल्य आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशातून या योजनेचा प्रीमियम कापला जाणार नाही. त्याऐवजी सरकारकडून वार्षिक स्वरूपात देण्यात येणाऱ्या 6000 रुपयांतून ते पैसे वजा केले जातील. फक्त यासाठी शेतकऱ्याला तसा पर्याय निवडावा लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 सप्टेंबर 2019 रोजी झारखंडमधून ही योजना सुरू केली होती. परंतु त्याअंतर्गत 9 ऑगस्टपासूनच नोंदणीला सुरुवात झाली होती. प्रधानमंत्री किसान मानधन योजना असे त्या योजनेचे नाव आहे. शेतकर्‍यांना समर्पित असलेली सर्वात मोठी पेन्शन योजना आहे. यात सामील झालेल्या शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळते.

* नोंदणी करणे आवश्यक

पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) येथे नोंदणी केली जाईल.
> प्रत्येकाने आधार कार्ड देणे महत्त्वाचे आहे.
> तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्हाला सातबाऱ्याची द्यावे लागेल.
>  2 फोटो आणि बँक पासबुक देखील आवश्यक असेल.
>नोंदणी दरम्यान किसान पेन्शन युनिक क्रमांक आणि पेन्शन कार्ड तयार केले जाईल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* निम्मे प्रीमियम शासन भरणार

या योजनेचा शेतकऱ्यांनी तात्काळ फायदा घेणे आवश्यक आहे. कारण यात तुमचे काहीच नुकसान होणार नाही. अर्धा प्रीमियम मोदी सरकार भरत आहे, निम्मे तुम्हाला पैसे द्यावे लागतील. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण या योजनेतून बाहेर देखील पडू शकता. त्याचे पैसे बुडणार नाहीत. जोपर्यंत योजनेंतर्गत ते पैसे बँकेत जमा आहेत, तोपर्यंत बँकांच्या बचत खात्याइतकेच त्यावर व्याज मिळेल.

* 5 कोटी शेतकर्‍यांना लाभ देण्याचे लक्ष्य

PMKMY या पेन्शन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 5 कोटी शेतकर्‍यांना 60 वर्षांनंतर 3000 रुपये पेन्शन देण्यात येईल. सर्व 12 कोटी लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्याची योजना सरकारने आखली आहे.  2 हेक्टरपर्यंत शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळू शकतो.

* एलआयसी करणार फंडाचे व्यवस्थापन

जर पॉलिसीधारक शेतकऱ्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के रक्कम मिळेल. हे दरमहा 1500 रुपये असेल. भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) शेतकर्‍यांच्या पेन्शन फंडाचे व्यवस्थापन करेल. त्याचे किमान प्रीमियम 55 रुपये आणि जास्तीत जास्त 200 रुपये आहे. एखाद्याला जर पॉलिसी मध्येच सोडायची असेल तर त्या शेतकर्‍याला ठेवीची रक्कम आणि व्याज मिळेल.

You Might Also Like

रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?

आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत

उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

कमर्शिअल सिलेंडर स्वस्त; घरगुती गॅसच्या दरात बदल नाही

अमेरिकेचा भारतावर २५% टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू; कॅनडावर आजपासून ३५% शुल्क

TAGGED: #farmers #pension #scheme, #कोट्यवधी #शेतकऱ्यांना #मिळणार #36, 000रुपये #पेन्शन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ठाकरे सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवले, विरोधक म्हणतंय जनता सरकारला सत्तेतून उतरवेल
Next Article ठाकरे सरकारने उतरवल्यानंतर राज्यपाल खासगी विमानाने डेहराडूनला रवाना

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?