Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; नागपूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; नागपूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

admin
Last updated: 2025/07/04 at 8:24 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वाशिम, 4 जुलै (हिं.स.)। समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असताना गुरुवारी (३ जुलै) रात्री आणखी एक भीषण अपघात झाला. वाशिम जिल्ह्यात झालेल्या या अपघातात नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला असून गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. सध्या चालक चेतन हेलगे याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या भीषण अपघातात राधेश्याम जैसवाल (६७), माधुरी जैसवाल (५२), वैदही जैसवाल (२५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संगीता जैसवाल (५५) यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जैसवाल कुटुंब पुण्यात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. गुरुवारी ते आपल्या कारने नागपूरकडे परत येत असताना, रात्री आठच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात त्यांच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित होत महामार्गाच्या कडेला असलेल्या संरक्षक पट्ट्यांना जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले .

दरम्यान, या अपघातामागे चालकाला डुलकी आल्याचा किंवा अतिवेगाचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे जैसवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उमरेड परिसरात शोककळा पसरली आहे. सातत्याने होणाऱ्या अपघातांनी समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे, तसेच प्रशासनानेही उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

You Might Also Like

शैलेश जेजुरीकर पीॲंडजीचे पुढचे सीईओ

निवडणुकीसाठी मुदतवाढ मागणार : सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात अर्ज

चीनमध्ये अतिवृष्टीचा कहर: बीजिंगमध्ये ३४ मृत्यू, ८०,००० नागरिकांचे स्थलांतर

वादग्रस्त मंत्री, आमदारांविरोधात कारवाई करा; अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ – अंबादास दानवे यांचा इशारा

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोफत नोटबुकचे प्रकाशन; विद्यार्थ्यांना वाटपाचा सामाजिक उपक्रम

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे 63 जणांचा मृत्यू 40 बेपत्ता
Next Article बाजीरावांच्या पुतळ्यासाठी एनडीएचीच जागा योग्य- अमित शाह

Latest News

पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
देश - विदेश July 30, 2025
crime
सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी
सोलापूर July 30, 2025
आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा
राजकारण July 30, 2025
लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नव्हता – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
देश - विदेश July 30, 2025
जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांची बस सिंध नदीत कोसळली; सर्व जवान सुखरूप, चालक गंभीर जखमी
देश - विदेश July 30, 2025
पंतप्रधान मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीतून किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता वितरीत करणार
देश - विदेश July 30, 2025
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय
महाराष्ट्र July 30, 2025
ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूबवर बंदी; सोशल मीडियावर सर्वप्रथम असा कायदा
देश - विदेश July 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?