Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; नागपूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; नागपूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

admin
Last updated: 2025/07/04 at 8:24 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वाशिम, 4 जुलै (हिं.स.)। समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असताना गुरुवारी (३ जुलै) रात्री आणखी एक भीषण अपघात झाला. वाशिम जिल्ह्यात झालेल्या या अपघातात नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला असून गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. सध्या चालक चेतन हेलगे याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या भीषण अपघातात राधेश्याम जैसवाल (६७), माधुरी जैसवाल (५२), वैदही जैसवाल (२५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संगीता जैसवाल (५५) यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जैसवाल कुटुंब पुण्यात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. गुरुवारी ते आपल्या कारने नागपूरकडे परत येत असताना, रात्री आठच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात त्यांच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित होत महामार्गाच्या कडेला असलेल्या संरक्षक पट्ट्यांना जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले .

दरम्यान, या अपघातामागे चालकाला डुलकी आल्याचा किंवा अतिवेगाचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे जैसवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उमरेड परिसरात शोककळा पसरली आहे. सातत्याने होणाऱ्या अपघातांनी समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे, तसेच प्रशासनानेही उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

You Might Also Like

लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना

देशभरात मान्सूनचा जोर; मप्र-राजस्थानात पूरस्थिती, वीज कोसळून, बुडून पाच जणांचा मृत्यू

राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून उज्ज्वल निकमांसह चौघे राज्यसभेवर

दिग्गज दाक्षिणात्य अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन

भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका ३-२ ने जिंकली

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे 63 जणांचा मृत्यू 40 बेपत्ता
Next Article बाजीरावांच्या पुतळ्यासाठी एनडीएचीच जागा योग्य- अमित शाह

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?