पुणे, 7 मे (हिं.स.)।
भारताने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने मध्यरात्री पाकिस्तानी तळांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले. हे दहशतवादी अड्डे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होते. या हवाई हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते.
सोशल मीडियावर भारताने हवाई हल्ला केल्यानंतर तेथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मिसाईलच्या जोरदार वर्षावानंतर पाकिस्तानात पळापळ उडल्याचे दिसत आहे. मध्यरात्री भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केल्यानंतर पहाटे हवाई दलाची विमाने आकाशात झेपावली. पुण्याच्या एअरबेसवरूनही लढाऊ विमानांनी आकाशात घिरट्या घातल्या.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लढाऊ विमानाने आकाशाच्या दिशेने झेपावली. मध्यरात्रीपासून सकाळी सहा वाजेपर्यंत हा सराव सुरू होता. पाकिस्तानी हवाई दल हल्ला करण्याची शक्यता होती. यामुळे भारतीय हवाई दल हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते. पुण्याच्या एअर बेसवरून पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांना सरंक्षण पुरविण्यात आले होते.