Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या उद्योगांना दिलासा; कंपन्यांविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया राबवण्यास स्थगिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या उद्योगांना दिलासा; कंपन्यांविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया राबवण्यास स्थगिती

Surajya Digital
Last updated: 2020/09/25 at 7:10 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : लॉकडाउनमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या उद्योगांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने नव्याने कोणत्याही कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यास स्थगिती आणखी तीन महिने वाढवली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली.

या निर्णयामुळे २५ मार्च अथवा त्यानंतर थकीत झालेली कर्जे आता २५ डिसेंबरपर्यंत दिवाळखोरी प्रक्रियेसाठी पात्र समजली जाणार नाहीत. याआधी आत्मनिर्भर भारत अंतर्गत दिवाळखोरी आणि नादारी कायदा कलम ७, ९ आणि १० सहा महिन्यांसाठी तात्पुरते रद्द करण्यात आले होते. यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना दिलासा मिळाला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उद्योग क्षेत्रात व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने कोरोना संकटाने एखादा उद्योग कर्जबाजारी झाल्यास पुढील वर्षभर दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करू नये, यासाठी सरकारने या प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्याशिवाय सरकारने दिवाळखोरीची प्रक्रियेसाठी आवश्यक किमान बुडीत कर्जाची मर्यादा १ लाख रुपयांवरून १ कोटीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

* विकासाला जबर बसला फटका

कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट चिंताजनक आहे, अशी निरीक्षणे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या व्यापार व विकास परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आली आहेत. कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे मानवी श्रमाने करण्यात येणारे उत्पादन बंद झाले आहे. त्याचाही अर्थव्यवस्थेच्या विकासाला जबर फटका बसला आहे. यामुळे भारतात महामंदी आली आहे आणि ती जाण्यास खूप वेळ लागणार आहे. चालू आर्थिक वर्षात झालेले अर्थव्यवस्थेचे आक्रसणे लोकांच्या उत्पन्नात कायमस्वरूपी घट करून गेले आहे, याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #दिवाळखोरी #उंबरठ्यावर #दिलासा #कंपनी #निर्णयावर #नीलासत्यनारायण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एसीबीने केली एसीपीवर कारवाई; काढली बेकायदेशीर कमाईची ७० कोटींची संपत्ती
Next Article शहीद जवान बडोलेंना दिला मुलींनी मुखाग्नी; गृहमंत्री देशमुखांनी केले सांत्वन

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?