Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या उद्योगांना दिलासा; कंपन्यांविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया राबवण्यास स्थगिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या उद्योगांना दिलासा; कंपन्यांविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया राबवण्यास स्थगिती

Surajya Digital
Last updated: 2020/09/25 at 7:10 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : लॉकडाउनमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या उद्योगांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने नव्याने कोणत्याही कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यास स्थगिती आणखी तीन महिने वाढवली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली.

या निर्णयामुळे २५ मार्च अथवा त्यानंतर थकीत झालेली कर्जे आता २५ डिसेंबरपर्यंत दिवाळखोरी प्रक्रियेसाठी पात्र समजली जाणार नाहीत. याआधी आत्मनिर्भर भारत अंतर्गत दिवाळखोरी आणि नादारी कायदा कलम ७, ९ आणि १० सहा महिन्यांसाठी तात्पुरते रद्द करण्यात आले होते. यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना दिलासा मिळाला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उद्योग क्षेत्रात व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने कोरोना संकटाने एखादा उद्योग कर्जबाजारी झाल्यास पुढील वर्षभर दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करू नये, यासाठी सरकारने या प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्याशिवाय सरकारने दिवाळखोरीची प्रक्रियेसाठी आवश्यक किमान बुडीत कर्जाची मर्यादा १ लाख रुपयांवरून १ कोटीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

* विकासाला जबर बसला फटका

कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट चिंताजनक आहे, अशी निरीक्षणे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या व्यापार व विकास परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आली आहेत. कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे मानवी श्रमाने करण्यात येणारे उत्पादन बंद झाले आहे. त्याचाही अर्थव्यवस्थेच्या विकासाला जबर फटका बसला आहे. यामुळे भारतात महामंदी आली आहे आणि ती जाण्यास खूप वेळ लागणार आहे. चालू आर्थिक वर्षात झालेले अर्थव्यवस्थेचे आक्रसणे लोकांच्या उत्पन्नात कायमस्वरूपी घट करून गेले आहे, याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

You Might Also Like

विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री

अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी

अमेरिका : ग्लोबल टेरिफच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द

ट्रम्प यांच्यावर केलेल्या पोस्टबद्दल मस्क यांच्याकडून खेद व्यक्त

पाकिस्तान सैन्य आणि बलूच बंडखोरांमधील झटापटीत पाकचे २३, बलूच आर्मीचे ९ जवान ठार

TAGGED: #दिवाळखोरी #उंबरठ्यावर #दिलासा #कंपनी #निर्णयावर #नीलासत्यनारायण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एसीबीने केली एसीपीवर कारवाई; काढली बेकायदेशीर कमाईची ७० कोटींची संपत्ती
Next Article शहीद जवान बडोलेंना दिला मुलींनी मुखाग्नी; गृहमंत्री देशमुखांनी केले सांत्वन

Latest News

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक
महाराष्ट्र June 12, 2025
एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे
महाराष्ट्र June 12, 2025
एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख
महाराष्ट्र June 12, 2025
विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री
देश - विदेश June 12, 2025
अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी
देश - विदेश June 12, 2025
शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी
महाराष्ट्र June 12, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?