अखेर त्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या १४६ विकास कामांना देयके देण्याचे जि.प. ला शासनाचे आदेश
तर. ४३ कामांना आक्षेप कायम
अखेर त्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या जलजीवन च्या 146 कामांना आर्थिक जलसंजीवनी मिळाली !
सोलापूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या जलजीवन मिशन कामापैकी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या 146 कामांची देय के संबंधित ठेकेदारांना आदा करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला देण्यात. आले आहेत . अशी माहिती जलजीवन मिशन विभागाकडून देण्यात आली . त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून रखडलेल्या विकास कामाचे थकित देयेके पैसे लवकरच ठेकेदारांना मिळणार आहे .
चौकशीला लागलेल्या 189 कामापैकी 43 कामांमध्ये आक्षेप आहे त्यामुळे ती कामे अजून ही चौकशीच्या फेऱ्यातच अडकून पडली आहेत. तर 43 कामासंदर्भात चौकशी समितीकडे आक्षेपांची पूर्तता संबंधित मक्तेदाराने केले नसल्याचा ठप्पाका ठेवण्यात आला आहे . या 43 कामात अक्कलकोट तालुक्यातील सर्वाधिक अकरा कामांचा समावेश आहे . तात्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्या कालावधीत 189 जलजीवन. विषयीच्या कामात अनियमित्ताचा झाल्या प्रकरणी तात्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशी समिती नेमली होती. या संदर्भात संजय माळी समितीच्या अहवाल प्राप्त होऊन सुमारे दोन वर्षाच्या कालावधी उलटला तरी जिल्हा परिषद प्रशासनाला ठेकेदारांनी या संदर्भात कोणतीही माहित अद्याप ठेकेदाराकडून मिळाली नाही.
या बाबत कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने मोतीलाल राठोड अभिमानी पवार राहुल कांबळे पाटील आनंद तोडकरी यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता .याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने 146 कामाची देयके संबंधित ठेकेदारांना मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे .जलजीवन मिशन अंतर्गत १८९ कामासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या प्रकरणाची चौकशी करण्यात आली संजय माळी यांच्या चौकशी समितीने अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सपोर्ट केला जिल्हाधिकारी यांनी सदर योजनेच्या रिपोर्ट सचिवाकडे. सोपविला होता.