जयपूर, 08 एप्रिल (हिं.स.) : राजस्थानच्या जयपूर येथे 13 मे 2008 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 4 दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जयपूरच्या विशेष न्यायालयाने मोहम्मद सैफ, मोहम्मद सरवर आझमी, सैफुर्रहमान आणि शाहबाज अहमद यांना दोषी ठरवले होते. यानंतर आज, मंगळवारी दोषींना ही शिक्षा सुनावण्यात आली.
जयपूर येथे 13 मे 2008 रोजी एकापाठोपाठ एक असे 8 बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्ब चांदपोल बाजारातील एका मंदिराजवळ सापडला होता. जो निकामी करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोटात 71 जणांचा मृत्यू झाला होता. जयपूर बॉम्बस्फोटाशी संबंधधित प्रकरणांत चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर, राजस्थान उच्च न्यायालयाने मार्च 2023 मध्ये सर्वांना निर्दोष सोडले होते. सुमारे 17 वर्षे जुन्या या प्रकरणात, सरकारी वकिलांनी 112 साक्षीदारांचे जबाब नोंदवले, तर सुमारे 1200 कागदपत्रे न्यायालयात सादर केली. यानंतर न्यायालयाने आज, मंगळवारी 600 पानांचा निकाल जाहीर केला. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 13 झणांना आरोपी केले होते. यांतील 3 जण अद्यापही फरार आहेत. तर 2 जण हैदराबाद आणि दिल्लीतील कारागृहात आहेत. तर 2 जण दिल्लीच्या बाटला हाऊस एनकाउंटरमध्ये मारले गेले होते. —————————–