Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: २१ जूनपासून १८ वर्षांहून अधिकच्या नागरिकांसाठी मोफत लसीकरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

२१ जूनपासून १८ वर्षांहून अधिकच्या नागरिकांसाठी मोफत लसीकरण

Surajya Digital
Last updated: 2021/06/07 at 10:50 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीय. कोरोना लसीकरणाच्या जबाबदारीतून पंतप्रधान मोदी यांनी राज्य सरकारांना मुक्त केलं आहे. यापुढे देशातील कोरोना लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिलीय. मोदी यांनी आज ऑनलाईन माध्यमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1401938934515453952?s=19

त्यावेळी त्यांनी २१ जूनपासून देशातील १८ वर्षाच्यावरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याची घोषणाही केलीय. त्याचबरोबर दिवाळीपर्यंत देशातील गरीबांना मोफत धान्य पुरवठा केला जाणार असल्याचंही सांगितलं.

स्वदेशी बनावटीच्या लसींमुळे भारताने लसीकरण मोहिमेत वेग घेतला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. जनतेला संबोधून बोलत असताना पंतप्रधानांनी देशाच्या लसीकरणासंदर्भातल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. त्याचवेळी मोदींनी पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यातला फरकही दाखवून दिला आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1401914325502201861?s=19

सध्या देशात आपण भारतीय बनावटीच्या दोन लसी तयार केल्या. जर त्या केल्या नसत्या तर काय झालं असतं याचा विचार करा. आत्ता जर आधीसारखी परिस्थिती असती तर संपूर्ण देशाचं लसीकरण करण्यासाठी ४० वर्षे लागली असती.”

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

देशातल्या लसीकरण मोहिमेवर बोलताना पंतप्रधान म्हणाले, “भारतात जर लसींची निर्मिती झाली नसती तर विचार करा काय झालं असतं…एवढ्या मोठ्या संख्येला आपण लस कशी देऊ शकलो असतो? पोलिओ, कांजिण्या अशा साथींच्या लसी विदेशातून भारतात यायला दशकं लागली होती. पण भारताने एकाच वर्षात दोन लसींची निर्मिती केली आहे.”

https://twitter.com/narendramodi/status/1401914285861842949?s=19

त्यांनी देशातल्या वैज्ञानिकांचं आणि शास्त्रज्ञांचं कौतुकही केलं. “आपल्या देशातले शास्त्रज्ञ, लस निर्मिती कंपन्या बड्या देशांच्या तोडीस तोड काम करत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत २३ कोटी देशवासियांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. लस निर्मितीसाठी सरकारनं अर्थसाहाय्य केलं आहे. त्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले, भारतात लस उत्पादक कंपन्यांना सरकारनं संशोधनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यापासून सगळी मदत केली आहे. या कंपन्यांना हजारो कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे”,असंही ते म्हणाले.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1401883774703468553?s=19

“जेव्हा भारताची लस आली तेव्हा काही लोकांनी अनेक माध्यमांद्वारे शंका-कुशंकाना उपस्थित केल्या. लोकांनी लस घेऊ नये यासाठी अफवा पसरवण्यात आल्या. जे लोग अशा प्रकारे अफवा पसरवत आहेत त्यांनाही देश बघत आहे. जे लोक अशाप्रकारे लसीवर शंका उपस्थित करत आहेत, अफवा पसरवत आहेत ते आपल्या भोळ्या भाऊ-बहिणींच्या जीवाशी खेळत आहेत”, अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला. तसेच “अशा अफवांपासून सतर्क राहण्याची जास्त आवश्यकता आहे. मी सर्वांना विनंती करतो, लसीबाबत जागृकता वाढवा”, असं आवाहन देखील मोदींनी यावेळी केलं.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1401946007361921027?s=19

“लसींच्या आगामी काळातल्या पुरवठ्याबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केलं आहे. देशात सध्या सात कंपन्या करोना प्रतिबंधक लसीचं उत्पादन करत आहेत. तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत. दुसऱ्या देशांशी पण लसींच्या पुरवठ्याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होणार आहे”, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #२१जूनपासून #१८वर्षांहून #अधिकच्या #नागरिकांसाठी #मोफत #लसीकरण, #Freevaccination #citizens #above #18yearsage #21June
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुणे आग – राज्याकडून 5 लाखांची तर केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर
Next Article सोलापूर शहरात गेल्या 24 तासात एकही कोरोना बळी नाही

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?