अक्कलकोट : जि.प.शालेय पोषणआहार योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन अंतर्गत घुंगरेगाव जि.प. शाळा येथे शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली होती. त्यातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.
खिचडी खाल्ल्यानंतर, शाळा सुटल्यावर काही मुलांना घरी गेल्यावर मळमळ उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्यानं पालकांनी फोनद्वारे गटशिक्षणाधिकारी तक्रार केल्यानंतर करजगी येथील आरोग्य केंद्रातील डाँक्टरांनी गावात येऊन काही वस्तीवरील विद्यार्थ्यांची तपासणी केली असता दोन विद्यार्थांना शाळेतला भात खाल्ल्यानं, विद्यार्ध्यांना विषबाधा झाल्याचे आढळून आले.
मुलांना विचारपूस केले असता भात शिळा असल्याचे वास येत होता, असे मुलांनी पालकांना सागितले. अस्वच्छ शिळा भात मुलांनी तो तसाच खाल्लामुळे त्रास झाल्याचे पालकांनी सागितले. शाळेतील भोजनआहार मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी विद्यार्थीना भात देण्यापूर्वी अगोदर स्व:ता खाऊन आहार योग्य का नाही का पाहणी न करता मुलांना शिळा भात का दिला गेला ? स्वयंपाक शाळेच्या किचन मध्ये का बनवला गेला नाही ? याची काळजी का घेतली नाही, असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे.
मुलांच्या जिवाशी खेळणारे या घटनेला जे जबाबदार असतील त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी विषबाधा झालेल्या मुलांच्या पालकांकडून करण्यात आली आहे. शाळेतील भोजन आहार मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी विद्यार्थीना भात देण्यापूर्वी अगोदर स्वत: खाऊन आहार योग्य का नाही का पाहणी न करता मुलांना शिळा भात का दिला गेला ? स्वयंपाक शाळेच्या किचन मध्ये का बनवला गेला नाही, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
विषबाधेसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
गावातील एका कुटुंबातील आदल्या दिवशीची देवकार्य कार्यक्रम होता. हाच राहिलेला भात का दिला गेला ?शाळेच्या मुख्याध्यापक संगनमताने दिली गेली का असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे. मुलांच्या जिवाशी खेळणारे या घटनेला जे जबाबदार असतील त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी विषबाधा झालेल्या मुलांच्या पालकांकडून करण्यात आली आहे.
Akkalkot: Poisoning of Ghungregaon ZP school children through khichdi
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ मालट्रकने सोलापुरातील दोन महिलांना चिरडले
सोलापूर : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णीच्या हद्दीत एका मालट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन महिलांना चिरडल्याने त्या जागीच ठार झाल्या.
या मालट्रकने हाॅटेल समोर उभ्या असलेल्या एक मोटार सायकल व तीन कारला धडक देऊन त्यांचे नुकसान केले. हा अपघात बुधवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातामध्ये जयश्री चंद्रकांत वरपे ( वय-५५ ), शांताबाई विठ्ठल चौरे ( वय- ७५ दोघीही रा. कोंडी ता उत्तर सोलापूर) या ठार झाल्या.
या अपघात प्रकरणी जयंत साठे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून मालट्रक चालक संदीपान नवनाथ जगताप ( वय- ४३ रा. गौरगाव ता. कळंब जि. उस्मानाबाद) यास पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी ओमासे करीत आहेत.
मालट्रकने आणखी चार वाहनाला धडक देऊन नुकसान केले. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी २३ मार्च रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील हॉटेल जगदंबाच्या समोर भरधाव आलेल्या मालट्रकने हॉटेलसमोर उभ्या असलेल्या जयश्री चंद्रकांत वर्पे (वय ५५) व शांताबाई विठ्ठल चवरे (वय ७५) दोघी रा. कोंडी ता. उत्तर सोलापूर) यांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. मालट्रक तसाच पुढे वेगाने गेल्याने हॉटेल समोरील मालट्रक (क्र-एम.एच-११-सीएच-८३००), स्कॉर्पिओ (एम.एच-१५-एजे ०१००), दुचाकी (क्र-एम.एच-४५-एके-५२७४), एकोस्पोर्ट गाडी (क्र.एम.एच ; १३ डीई-५२५६), (एम.एच-१३-सीयु-६५०२) व (एम.एच-४५ए.एल-८१४६) या गाड्यांना जोरात धडक देऊन या वाहनांचे मोठे नुकसान केले. तसेच अपघात होताच चालक संदीपान नवनाथ जगताप (रा. गौरगाव ता.कळंब) हा पळून गेला. याबाबत जयंत पोपट साठे (रा. बीबी दारफळ) याने फिर्याद दिली असून सपोनि ओमासे हे अधिक तपास करीत आहेत.