Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सरकारचे निर्माते शरद पवारांनी सांगितले अर्धसत्य – देवेंद्र फडणवीस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

सरकारचे निर्माते शरद पवारांनी सांगितले अर्धसत्य – देवेंद्र फडणवीस

Surajya Digital
Last updated: 2021/03/21 at 8:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नागपूर : शरद पवारांनी आज घेतलेली पत्रकार परिषद ऐकून मला आश्चर्य वाटलं, असं फडणवीस यांनी म्हटलं. ‘शरद पवार या सरकारचे निर्माते आहेत. त्यामुळे सरकारनं काहीही केलं तरीही त्यांना बचाव करावा लागतो. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना परमबीर सिंग यांनी पुन्हा सेवेत घेतलं हे खरं आहे. पण हे अर्धसत्य आहे. शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं. परमबीर सिंग यांनी निर्णय घेतल्यानंतर ठाकरे सरकारनं आक्षेप का नोंदवला नाही? त्यावेळी सरकार झोपलं होतं का?,’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. यामुळे देशमुख यांच्यासह ठाकरे सरकारदेखील अडचणीत आलं असून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

परमबीर सिंग यांनी वाझेंना पुन्हा पोलीस दलात रुजू करून घेतलं हे खरं आहे. पण अशा प्रकारे सेवेत घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पद दिलं जात नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री देशमुख यांना नियम माहीत नाहीत का? सरकारच्या आशीर्वादाशिवाय वाझेंना इतकं महत्त्वाचं पद मिळू शकत नाही. सरकारचा वरदहस्त असल्यानंच वाझेंकडे अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सोपवला गेला, असा दावा त्यांनी केला.

* अतिशय महत्त्वाचा पुरावा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीनं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी पद सोडल्याशिवाय त्यांची निष्पक्षपणे चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा तातडीनं राजीनामा घेतला जावा. परमबीर सिंग यांनी त्यांच्याच पत्रात उल्लेख केलेलं पोलीस अधिकाऱ्यांसोबतच संभाषण हा महत्त्वाचा पुरावा आहे. हे चॅट त्यांना पदावरून दूर करण्यापूर्वीच आहे. त्यामुळे हा पुरावा अतिशय महत्त्वाचा आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

You Might Also Like

राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव

सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त

विधिमंडळात 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात

पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ

TAGGED: #Government's #creator #SharadPawar #said #halftruth #DevendraFadnavis, #सरकारचे #निर्माते #शरदपवारांनी #सांगितले #अर्धसत्य #देवेंद्रफडणवीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लवकर जनतेच्या मनातील उमेदवार पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी जाहीर करु
Next Article रुग्णालय परिसरात सापडला गावठी बॉम्ब, टायमर वाजल्यानंतर आले लक्षात

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?