Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: देशात मोठी जीवीतहानी; वीज पडून 68 जणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

देशात मोठी जीवीतहानी; वीज पडून 68 जणांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/07/12 at 3:06 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशात पाऊस, वीज पडून मोठे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू झाला. या ठिकाणी वीज पडल्यामुळे आतापर्यंत जवळपास 68 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात वेग-वेगळ्या भागात वीज पडल्यामुळे आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये वीज पडल्यामुळे जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

https://twitter.com/indusdotnews/status/1414510257712345089?s=19

उत्तर देशात काही राज्यांमध्ये वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यात तब्बल 68 जणांचा मृत्यू झाला आहे. यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

या दोन्ही राज्यात काल वीजांचा कडकडाट होत मान्सूनच आगमन झालं. राजस्थानमधील अंबर किल्ल्याजवळ वीज कोसळून एकाच ठिकाणी तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 जण जखमी झाले. यात मरण पावलेले मृत सर्वजण पर्यटक आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

'चिकन दिलं तरच डिस्चार्ज घेईल, नाही तर इथेच राहीन,' हट्टापुढे डॉक्टरही नमले https://t.co/v35kuw7dUm

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021

पोलीस प्रशासनानं तात्काळ धाव घेत मदतकार्य पोहचवलं, सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. मृताच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत घोषीत केलीयं. कोट्टा, धोलपूर, झालवाड येथेही वीज कोसळून जवळपास 8 जणांचे मृत्यू झालेत.

काल रविवारी उत्तर देशामध्ये प्रचंड पाऊस कोसळला. पावसासोबत विजांचा कडकडाटही होत होता. काही ठिकाणी वीज पडून नागरिक मृत्युमुखी पडले. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त म्हणजे 41 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सर्वाधिक मृत्यू प्रयागराज येथे झाले असून या घटनांतील मृत्यू पावलेल्यांची संख्या 14 इतकी आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1414252967272673287?s=19

तसंच कानपूर देहात आणि फतेहपूर येथे प्रत्येकी पाच, कौशांबी येथे चार, फिरोजाबाद येथे 3, उन्नाव-हमीरपूर-सोनभद्र येथे प्रत्येकी दोन, तर कानपूर नगर-प्रतापगढ-हरदोई-मिर्झापूर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याखेरीज 200 जनावरंही दगावली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्काळ आर्थिक मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत, तसंच आर्थिक मदतही जाहीर केली आहे.

राजस्थानमध्येही वीज पडून 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात जयपूरमध्ये 11, धौलपूरमध्ये 3, कोटा येथे 4, झालावाड आणि बारां येथे 1 असे लोक दगावले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना राजस्थान सरकारतर्फे 5 लाखांच्या भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातही वीज पडून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात श्योपूर आणि ग्वाल्हेर येथे प्रत्येकी 2 तर शिवपुरी-अनुपपूर-बैतुल येथे प्रत्येकी एक जण मृत्यू झाला आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1414227672431960071?s=19

You Might Also Like

राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट

चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे

शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

जम्मू-काश्मीर: कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

TAGGED: #Greatloss #life #country #68killed #lightning #strike, #देशात #मोठी #जीवीतहानी #वीजपडून #68जणांचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदार सुभाष देशमुखांना अल्पशिक्षितांसाठी काही तर करायचंय, मागितल्या विचार आणि सूचना
Next Article रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा ‘रामराम’

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?