Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गुजरात । नदीवरील केबल पूल तुटल्याने 400 लोक नदीत पडले, अनेकजण वाहून गेल्याची शक्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

गुजरात । नदीवरील केबल पूल तुटल्याने 400 लोक नदीत पडले, अनेकजण वाहून गेल्याची शक्यता

Surajya Digital
Last updated: 2022/10/30 at 9:12 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE
  • ● 100 हून अधिक लोक पाण्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य जोरात सुरू आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ हा पूल बंद होता.

गांधीनगर : गुजरातमधील मोरबी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे मच्छू नदीवरील केबल पूल तुटला असून त्यामुळे सुमारे 400 लोक नदीत पडले आहेत. अनेक जण नदीत वाहून गेल्याची शक्यता आहे. अपघातानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दुरूस्तीनंतर 5 दिवसांपूर्वी पूल पुन्हा खुला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. Gujarat. 400 people fall into river after cable bridge over river breaks, many more likely to be swept away Morbi Machu River

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 एकाच वेळी 36 उपग्रह सोडले…; पंतप्रधानांनी मन की बातमध्ये केले कौतुक

 

नदीवरील केबल पूल तुटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण नदीत पडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. हा झुलता पूल नूतनीकरणानंतर नुकताच खुला करण्यात आला होता. सुटीच्या काळात झुलता पुलावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू होती.

अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे 400 ते 500 लोक उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. हा पूल खूप जुना असून काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. 5 दिवसांपूर्वी ते सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता.

 

100 हून अधिक लोक पाण्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य जोरात सुरू आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ हा पूल बंद होता. बचाव पथकाने अनेकांना नदीतून वाचवले असून त्यांना रुग्णालयात पाठवले आहे. इतर लोकांचाही शोध सुरू आहे. सर्व लोकांना लवकरात लवकर नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सुट्टीचा दिवस असल्याने इथे खूप गर्दी होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 एकाच वेळी 36 उपग्रह सोडले…; पंतप्रधानांनी मन की बातमध्ये केले कौतुक

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात छठ सणाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ” भारताने एकाच वेळी 36 उपग्रह सोडले आहेत. पूर्वी भारतातील अंतराळ क्षेत्र सरकारी यंत्रणेच्या कक्षेत मर्यादित होते. जेव्हा हे अंतराळ क्षेत्र भारतातील तरुणांसाठी, भारताच्या खासगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले, तेव्हा त्यात क्रांतिकारी बदल होऊ लागले आहेत, असे यावेळी पंतप्रधान म्हणाले.

समस्त भारतीय दिवाळी सणाच्या तयारीत मग्न असताना आणि फटाक्यांच्या आतषबाजीने, दिव्यांच्या रोषणाईने तेजाळून निघण्यास आसमंत आसुसलेला असतानाच भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने अंतराळात एक नवा इतिहास रचला. ब्रिटनच्या कम्युनिकेशन नेटवर्क ‘वन वेब’चे तब्बल 36 उपग्रह इस्रोने आपल्या जीएसएलव्ही-एमके-3 या सर्वांत वजनदार रॉकेटद्वारे अंतराळात प्रक्षेपित केले.

 

हे उपग्रह लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये यशस्वीपणे स्थापित करण्यात आले आहेत. लोअर अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीची सर्वांत खालची कक्षा. पृथ्वीपासून 1600 ते 2000 किलोमीटर अंतरावर हे क्षेत्र आहे. या कक्षेमध्ये वस्तूचा वेग सुमारे 27 हजार किलोमीटर प्रतितास इतका असतो. त्यामुळे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये उपग्रह स्थापित करणे अत्यंत आव्हानात्मक असते. त्यामुळेच आज पंतप्रधान मोदी यांनी याचा उल्लेख केला.

मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले भारतीय परंपरेत छटपूजेला म्हणजेच सूर्यपुजेला फार महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या सार्वजनिक छटपूजेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. ठिकठिकाणी राज्याराज्यांमध्ये सार्वजनिक छटपूजा करून सूर्य उपासनेचे वेगवेगळे आयाम आपल्याला दिसून येतात. इतकेच नाही तर प्रदेशांमधून देखील मोठ्या प्रमाणावर छटपूजा केली जात असल्याचे दिसते. आता आपण याला नवीन आयाम जोडला पाहिजे आणि तो आयाम सौर ऊर्जेचा असला पाहिजे.

 

सौरऊर्जा आपल्या भारतीयांच्या जीवनातला जीवनशैलीचा भाग आहे. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि स्वस्त मिळवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. गुजरात मधल्या मोढेरासारखे संपूर्ण गावच सौरऊर्जेने व्याप्त आहे. मोढेरा गावाने सौर ऊर्जेच्या वापर वाढवून उर्जा स्वयंपूर्णता मिळवली आहे. अशा अनेक गावांनी पंतप्रधान कार्यालयाकडे सौर ऊर्जेने व्याप्त होण्याच्या मागण्या केल्या आहेत. केंद्र सरकार त्यांचा नक्की सकारात्मक विचार करेल. सौरऊर्जेसंबंधी जितकी जनजागृती होईल तितकी स्वच्छ ऊर्जा स्वस्त ऊर्जा या दृष्टीने आपल्याला पावले उचलता येतील आणि अंतिमतः देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल, याची आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली आहे.

 

□ मन की बात मध्ये मोदी म्हणाले….

 

• इस्रोने नवीनतम प्रक्षेपणांसह भारताला जागतिक व्यावसायिक – बाजारपेठेत एक मजबूत खेळाडू बनवले आहे.

– संपूर्ण जग सौरऊर्जेकडे आपले भविष्य पाहत आहे. आम्ही आमच्या शेतकरी बांधवांसाठी किसान कुसुम योजना सुरू केली. ज्या अंतर्गत शेतकरी सौर पंप बसवत आहेत.

– गुजरातमधील मोढेरा गावाचा मोदींनी उल्लेख केला. या गावातील जवळपास सर्व घरे त्यांच्या विजेची गरज भागवण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करत आहेत.

 

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #Gujarat #400people #fall #river #cablebridge #break #likely #swept #Morbi #MachuRiver, #गुजरात #नदी #केबल #पूल #तुटल्याने #400लोक #मोरबी #मच्छूनदी #शक्यता #मनकीबात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । किर्तनाला निघालेल्या वृद्ध दांपत्यांचा अपघात, पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
Next Article मोरबी केबल पूल अपघात मृतांचा आकडा 141 वर; 140 वर्षे जुना पूल

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?