Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अतिवृष्टीमुळे नळदुर्ग किल्ल्याची पडझड; २५ वर्षांने पाणी महालावरून पाणी कोसळले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रसोलापूर

अतिवृष्टीमुळे नळदुर्ग किल्ल्याची पडझड; २५ वर्षांने पाणी महालावरून पाणी कोसळले

Surajya Digital
Last updated: 2020/10/22 at 9:05 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर / उस्मानाबाद : राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला म्हणून ख्याती असलेल्या नळदुर्ग येथील किल्ल्याची अतिवृष्टीमुळे पडझड झाली आहे. सुमारे ५० लाखाहून अधिक नुकसान त्यामुळे झाले असल्याचा दावा किल्ल्याचे विकासक असलेल्या खासगी कंपनीने केला आहे.

बोरी नदीच्या प्रवाहाने रौद्र रूप धारण केल्यामुळे तब्बल २५ वर्षांनंतर पाणी महालावरून पाणी कोसळत होते. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे किल्ल्यातील अनेक भागांची पडझड झाली असून पाणी महालाचेही मोठे नुकसान झाले आहे. पाणी ओसरल्यानंतर किल्ल्यातील अनेक ठिकाणांची दुरवस्था समोर आली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केलेली अनेक कामे चक्क वाहून गेली आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मागील सहा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बोरी नदीला पूर आला होता. नदीच्या जलसाठ्यात अवघ्या दोन दिवसातील मुसळधार पावसाने वाढ झाली. किल्ल्यातील नर-मादी आणि शिलक हे तिन्ही धबधबे सुरू झाले होते. पाण्याचा जसजसा प्रवाह वाढत गेला, तसतसे पाण्याच्या प्रवाहाने रौद्र रूप धारण केले. सोलापूर येथील युनिटी मल्टीकॉन कंपनीने पाणी महलाच्या खालील बाजूस बांधलेल्या तळ्याचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले लोखंडी पाईपचे बॅरीगेड व सुशोभिकरणाचे नुकसान झाले आहे.८० फूट उंच असलेल्या पाणी महालावरून पाणी कोसळत असताना आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा पहायला मिळाले.

किल्ल्यातील नर-मादी धबधबा पाहताना कोणत्याही पर्यटकाच्या जीवितास धोका होवू नये यासाठी भिंतीच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक लोखंडी पाईप बसविण्यात आले होते. दरम्यान बुधवारी झालेल्या पावसामुळे बोरी नदीस महापूर आला. नळदुर्गच्या बोरी धरणाच्या बांधकामनंतर आलेला हा सर्वात मोठा महापूर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे किल्ल्यातील प्रेक्षणीय पाणी महालाच्या भिंतीवरुन सुमारे १५ फूट पाणी वाहून पडत होते. त्यामुळे या महापुरात आलेल्या अनेक झाडा झुडपांमुळे, सोयाबीनच्या गंजीमुळे अनेक साहित्य वाहून गेले आहे.

पन्नास लाखाच्या नुकसानीचा अंदाज
किल्ल्यात युनिटी मल्टीकॉन या कंपनीने पर्यटनस्थळ विकासासाठी बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रेक्षणीय १० लाख लिटरचे दोन मोठे बंधारे निर्माण केले होते. तसेच शोभेची फुलझाडे, बगीचा, कारंजे, संरक्षक साहित्य, रस्ते, आंब्याची झाडे, सहा वीज पंप पाण्याच्या अतिवेगातील प्रवाहात वाहून गेले आहेत. त्यामुळे कंपनीचे जवळपास ५० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज संचालक कपील मौलवी यांनी वर्तविला आहे.

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग

सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

TAGGED: #अतिवृष्टी #नळदुर्गकिल्ला #पडझड #50लाखनुकसान #25वर्षाने #पाणीकोसळले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नाशिकमध्ये माजी नगराध्यक्षाची हत्या; दोनदा त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद भूषवले
Next Article पंकजा मुंडेंना शिवसेनेकडून खुली ऑफर; भाजपात अनेक प्रमुख नेते नाराज, त्यांच्या बुध्दीप्रमाणे निर्णय घ्यावा

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?