Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; वाहतुकीवर मोठा परिणाम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; वाहतुकीवर मोठा परिणाम

admin
Last updated: 2025/08/18 at 4:00 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, १८ ऑगस्ट – पुढील तीन ते चार दिवस मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून, याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत.

हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यासाठी १९ ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट, तर २० ऑगस्टसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. सांताक्रूझ वेधशाळेने ८५ मिमी आणि कुलाबा वेधशाळेने ५५ मिमी पावसाची नोंद केली आहे. स्वयंचलित केंद्रांच्या माहितीनुसार फोर्टमध्ये १३४ मिमी, कॉटन ग्रीनमध्ये १४५ मिमी, ग्रँट रोडमध्ये १२१ मिमी तर लोअर परेलमध्ये १२९ मिमी पाऊस झाला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासूनच्या पावसामुळे शहर आणि उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी वाढली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली ते वांद्रे दरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून, पंधरा-वीस मिनिटांचा प्रवास दीड तासांपेक्षा अधिक वेळेत होत आहे. सायन सर्कल परिसरात आणि अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले असून जवळपास एक फूट पाणी भरले आहे. पाऊस सुरूच राहिला तर सबवे बंद करण्याची शक्यता आहे.

सोमवारी सकाळपासून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’ असे आवाहन केले आहे.

कोकणातही मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून, वाऱ्याचा वेग वाढल्याने किनारी भागांत परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.

You Might Also Like

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर वाहतूक कोंडी

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी – विजय वडेट्टीवार

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर

मुंबई महापालिकेत भाजपाचाच झेंडा फडकणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात मुसळधार पावसाचा कहर; अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर
Next Article न्यूयॉर्कमधील हॉटेलमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू, आठ जखमी

Latest News

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देश - विदेश August 18, 2025
‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर
देश - विदेश August 18, 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण
महाराष्ट्र August 18, 2025
सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस
सोलापूर August 18, 2025
शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर August 18, 2025
सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब
सोलापूर August 18, 2025
बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?