Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्कलकोट : बळीराजा दमदार पावसाच्या प्रतिक्षेत; शेतकरी चिंतातूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

अक्कलकोट : बळीराजा दमदार पावसाच्या प्रतिक्षेत; शेतकरी चिंतातूर

Surajya Digital
Last updated: 2022/06/15 at 6:25 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ पीकपाणी वार्तापत्र…..

अक्कलकोट – खरीप मध्ये प्रामुख्याने तूर, सोयाबीन,मूग, उडीद, मका बाजरी, सुर्यफुल आदी पिके घेतली जातात. परंतू सध्या तालुक्यात दमदार पाऊस पडत नसल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. अर्धा जून महिना संपत आला तरी तालुक्यात वरुणराजाचे दमदार आगमन होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी मात्र चिंतातूर झाल्याचे पहायला मिळत आहे. Akkalkot: Baliraja waiting for heavy rains; Farmers worried about crop water

Contents
□ पीकपाणी वार्तापत्र…..स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

अक्कलकोट तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 1 लाख 41 हजार 880 हेक्‍टर आहे, त्या पैकी पेरणी दायक लागवडी योग्य 1 लाख 31 हजार 604 हेक्‍टर क्षेत्र आहे. आणि सध्या खरीप पिकाखाली 65 हजार 225 हेक्‍टर क्षेत्र योग्य आहे.

यंदा हवामान अंदाजानुसार शेतकरी खरिपाची तयारी करुन बसले आहेत. तर बागायत शेतक-यांना पाणी कमी पडत असल्याने ऊस, फळबाग आदी बागायत पीक मात्र वाळून चालले आहे. सध्या जमिनीत उष्णता असल्याकारणाने पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करता येणार नाही. अशा कमी पावसावर पेरणी केल्यास उगवण क्षमता कमी होते. मग दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. त्यामुळे पुरेशी ओलं झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन तालुका कृषि कार्यालयाकडून केली जात आहे.

परंतू इकडे पेरणीला उशीरा होत असल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. तालुका कृषि कार्यालयाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. तर शेतकरी तालुक्यात दमदार पावसाची प्रतिक्षा करताना दिसत आहे. यंदा हवामान अंदाजानुसार तालुक्यात पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता, परंतू हा अंदाज आता कुठेतरी फोल ठरतोय की काय अशी भीती शेतकर्‍यामध्ये आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

तालुक्यात सतत दोन वर्षे वरुणराजा मनसोक्त बरसल्याने तालुक्यातील नदी,नाले,ओढे व तलाव ओव्हर फ्लो झाले होते. यंदा मात्र तालुक्यात फक्त वादळी वारे व उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. यामुळे तालुक्यातील बळीराजा सध्या धास्तावला आहे. दररोज तालुक्यातील शेतकरी आकाशाकडे नजरा लावून वरुणराजाची प्रतिक्षा करत आहे. परंतू तालुक्यात वरुणराजाचे दर्शन मात्र होत नाही. आकाशात फक्त ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे.

तालुक्यात दमदार पाऊस पडताना दिसेना. तालुक्यात तडवळ व वसंतराव नाईक नगर भागात मात्र मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्याने या भागात काही प्रमाणात खरीप पेरण्या होत आहेत. बाकी तालुक्यातील संपूर्ण भाग मात्र अजून ही कोरडा ठाक पडला आहे. तालुक्यात अजूनही बहुसंख्य भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने या भागातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

》शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये. कारण सध्या जमिनीत उष्णता असल्याकारणाने पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अशा कमी पावसात पेरणी केल्यास उगवण क्षमता कमी होईल –

रामचंद्र माळी – प्रभारी तालुका कृषी अधिकारी (अक्कलकोट)

 

》 सध्याच्या घडीला तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही. जमिनीत ओलावा कमी आहे. यामुळे खत बी-बियाणे विक्री होताना दिसत नाही. याचाच परिणाम यंदा कृषी सेवा केंद्रावर होत आहे.

प्रो प्रा तुकाराम मोरे
आबा कृषी सेवा केंद्र (अक्कलकोट)

》 यंदा वसंतराव नाईक नगर परिसरात मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने सध्या या भागात खरीप पेरणी सुरु आहे. गत वर्षाप्रमाणेच यंदाही आमच्या भागात वेळेवर पाऊस झाल्याने वेळेवर पेरणी होत आहे.

सचिन जाधव, शेतकरी ( वसंतराव नाईक नगर तांडा)

 

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #Akkalkot #Baliraja #waiting #heavy #rains #Farmers #worried #crop #water, #अक्कलकोट #बळीराजा #दमदार #पाऊस #प्रतिक्षेत #शेतकरी #चिंतातूर #पीकपाणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मार्कंडेय सहकारी रुग्णालय निवडणूक; आठजणांचे अर्ज दाखल
Next Article Zareen Nikhat विशिष्ट समुदायाचे नव्हे देशाचे प्रतिनिधित्व करते – झरीन निकहत

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?