सोलापूर/प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी आता ग्रह भेटी देणार असल्याचे जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकाराणा सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील १० ते १५ वर्षपासून अनेक शेतकरी विविध कारणास्तव आत्महत्या केल्या आहेत.याची शासन दरबारी नोंद आहे मात्र त्यांच्या वारसांना मदती विषयी किंबा शासकीय योजना बद्दल प्रस्ताव दाखल करता येत नाही.अश्या सर्व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची यादी विविध विभागातून मागवण्यात आली आहे.
जे शेतकऱ्यनी बँकेचे कर्जाची वसुली तगादा,नापिकीमुळे,नैसर्गिक आपत्तीमुळे, नुकसान भरपाई मिळाली नसल्याने व इतर कौटुंबिक व वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली आहे अशी इतभूत माहिती गोळा करून त्याना विविध कागदपत्रे मिळण्यासाठी व पुढील कार्यवाही होण्यासाठी विविध शासकीय विभाग नुसार अधिकारी कर्मचारी भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत.गरज पडल्यास ज्या त्या तालुका स्तरीय तहसीलदार कार्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आशीर्वाद यांनी दिली आहे.