Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: न्यायालयाच्या निकालानंतर भाजप नेते झाले आक्रमक; केली गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रराजकारण

न्यायालयाच्या निकालानंतर भाजप नेते झाले आक्रमक; केली गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Surajya Digital
Last updated: 2020/08/19 at 4:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल देत सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल म्हणजे राज्य सरकारसाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. सुशांत सिंह प्रकरणाच्या संबंधित सर्व कागदपत्रे, पुरावे हे सीबीआयकडे सोपवण्यासही सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सांगितले आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी दोन ट्वीट्स केले आहेत. आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी म्हटलं, “महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलीस आयुक्तांनी २ महिने एफआयआर न घेणे दुर्देवी आहे. सुशांत सिंहच्या परिवाराला न्याय मिळेल”

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तर आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी म्हटलं, सुशांत सिंह प्रकरणासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हावा. मला आशा आहे की, आता तरी ठाकरे सरकार काही तरी शिकेल आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना न्याय मिळेल. तर किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की आता ठाकरे सरकारची दादागिरी संपेल.

सुशांत सिंह राजपूत याचा राहत्या घरात मृतदेह आढळला. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सुशांतने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यानंतर या प्रकरणात विविध अँगल्स समोर येऊ लागले आणि त्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी आपला तपास सुरू केला. तर त्याच दरम्यान या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी सुशांतचे कुटुंबीय, भारतीय जनता पक्षाचे नेते करु लागले. तसेच सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांत तक्रार दाखल करत आर्थिक गैरव्यवहार आणि सुशांतला आत्महत्या करण्यास रियाने प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.

आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा असे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतचे कुटुंबीय, रिया चक्रवर्ती, महाराष्ट्र सरकार, बिहार सरकार या सर्वांची बाजू ऐकून घेतली आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी

अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात

लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ

TAGGED: #भाजपआक्रमक #किरीटसोमय्या #अनिलदेशमुख #राजीनामा #मागणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पार्थ पवार आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्षाचे सुशांत प्रकरण सीबीआयकडे गेल्याने एकच ट्विट; सत्यमेव जयते!
Next Article “नातवांची मागणी आजोबाला आवडली का माहित नाही मात्र न्यायालयाने ग्राह्य धरली”

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?