Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चुकलेली संघ निवड, फसलेली रणनीती, भारतीय संघावर नामुष्की
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
ब्लॉग

चुकलेली संघ निवड, फसलेली रणनीती, भारतीय संघावर नामुष्की

Surajya Digital
Last updated: 2021/11/03 at 2:20 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

आखाती देशात सुरू असलेल्या टी २० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ हॉट फेव्हरेट समजला जात होता. भारतीय संघच हा विश्वविजेता होईल असाच विश्वास देशातील १३० कोटी जनतेला होता. मात्र भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात निराशाजनक कामगिरी करून देशवासीयांच्या विश्वासाला तडा दिला आहे.

पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारतीय फलंदाजांनी हाराकीरी करून सामना गमवला. पाकिस्तान विरुद्ध भारताची निराशाजनक कामगिरी करूनही न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात  भारत दमदार कामगिरी करून पुनरागमन करेल अशी भाबडी आशा क्रिकेट रसिकांना होती मात्र दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने पहिल्या सामन्याचीच पुनरावृत्ती केल्याने क्रिकेट रसिकांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे.

केवळ क्रिकेट रसिकच नाही तर जगभरातील आजी माजी क्रिकेट खेळाडूंनी देखील भारतीय संघावर टीका केली आहे. भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरीची बीसीसीआय पोस्ट मार्टम करणार का हा प्रश्न आहे. भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरीला कोणा एका खेळाडूला जबाबदार न धरता संपूर्ण संघाला आणि संघ व्यवस्थापनाला जबाबदार धरायला हवे.

त्याचबरोबर निवड समिती देखील तितकीच जबाबदार आहे. निवड समितीने फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करून संघातील प्रतिष्टीत खेळाडूंची निवड केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा काढून ऑरेंज कॅप मिळवणारा ऋतुराज गायकवाड याच्याकडे निवड समितीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराज गायकवाडकडे दुर्लक्ष करणे भारतीय संघाला महाग पडले. हार्दिक पांड्या हा अनफिट असूनही त्याची संघात निवड केली.

अष्टपैलू म्हणून निवड झालेल्या पांड्याने दोन्ही सामन्यात गोलंदाजी केली नाही. फलंदाजीतही त्याने निराशा केली. भुवनेश्वर कुमारने  आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी करूनही त्याची निवड करण्यात आली. वरून चक्रवर्ती पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरवूनही त्याची दुसऱ्या सामन्यात निवड करण्यात आली. इतकेच नाही तर त्याला पहिली महत्वाची षटके देण्यात आली. वरून चक्रवर्तीला दोन्ही सामन्यात एकही बळी मिळाला नाही. वरून चक्रवर्तीला संधी देताना अनुभवी रवीचंद्रन आश्विनकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. विश्वकरंडकासारख्या म्हत्वाच्या स्पर्धेत अश्विन सारख्या अनुभवी आणि मॅच विनर खेळाडूला डग आऊटमध्ये बसवणे ही चुकच नाही तर महाचूक आहे.

न्यूझीलंड विरुद्ध सलामीला रोहित शर्माच्या जागेवर ईशान किशनला पाठवण्याची संघ व्यवस्थापनाची चाल देखील फ्लॉप झाली. नवख्या ईशान किशनला रोहित शर्माच्या जागेवर पाठवून संघ व्यवस्थापनाने  रोहित शर्मावर अविश्वास दाखवला आहे त्यामुळे रोहित शर्माच्या मनोधैर्यावरही परिमाण होऊ शकतो. पहिल्या दोन्ही सामन्यातील फसलेली रणनीती ही विराट कोहलीच्या नेतृत्व क्षमतेवर शंका उपस्थित करणारी नाही. मोठ्या स्पर्धेत विराट कोहलीचे नेतृत्व फिके पडते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. चुकीची संघ निवड, फसलेली रणनीती  यामुळे स्पर्धेबाहेर पडण्याची नामुष्की भारतीय संघावर आली आहे.

भारताचे अजूनही तीन सामने आहेत या तिन्ही सामन्यात भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल शिवाय न्यूझीलंडला अफगाणिस्तान कडून हार पत्करावी लागेल तेंव्हाच भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल अर्थात ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. न्यूझीलंड अफगाणिस्तानकडून हार पत्करेल असे वाटत नाही. त्यामुळे भारतीय संघ स्पर्धेच्या बाहेर पडल्यातच जमा आहे. उरलेले तीन सामने ही केवळ औपचारिकता आहे.

* श्याम ठाणेदार – पुणे

You Might Also Like

गृहकलह… शरद पवारांचे वारसदार कोण  ?

राजकारणाचे उद्योग; उद्योगाचे राजकारण

आघाडीत बिघाडी… काँग्रेस-शिवसेनेच्या नव्या दोस्तीची सुरुवात

‘सततची तोंडपाटीलकी’ नडली… अदृश्य महाशक्ती सुद्धा तितक्याच ताकदीने काम करतीय

लगाम लावाच…आता नाही सहन होत…

TAGGED: #Wrong #team #selection #failed #strategy #humiliation #Indianteam, #चुकलेली #संघ #निवड #फसलेली #रणनीती #भारतीयसंघ #नामुष्की
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मी तर कोरोना लस घेतली नाही आणि घेणारही नाही – इंदुरीकर महाराज
Next Article काँग्रेस भवन परिसरातून पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना घेतलं ताब्यात

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?