Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जर भारत नसता तर मालदीवची अर्थव्यवस्था कोसळली असती – माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

जर भारत नसता तर मालदीवची अर्थव्यवस्था कोसळली असती – माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद

admin
Last updated: 2025/07/24 at 4:11 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

माले, 24 जुलै – “भारताने वेळेवर मदत केली नसती, तर मालदीवची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळली असती,” असे ठाम मत मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी व्यक्त केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भारताच्या योगदानाचे कौतुक करत आपली आर्थिक स्थिती स्पष्टपणे मांडली.

नशीद म्हणाले की, 2022-23 मध्ये पर्यटनातील घसरणीमुळे मालदीव आर्थिक संकटात सापडला होता. परकीय कर्जात मोठी वाढ झाली होती आणि देशात डॉलर्सची तीव्र कमतरता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत भारताने धान्य, इंधन आणि क्रेडिट लाइनद्वारे तातडीने मदत करून मालदीवला डिफॉल्ट होण्यापासून वाचवले. हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालदीव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाचे ठरत आहे. पंतप्रधान मोदी 25 आणि 26 जुलै रोजी मालदीव दौऱ्यावर असतील, जिथे ते स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

‘इंडिया फर्स्ट’ धोरणाची कबुली

माजी राष्ट्रपती नशीद यांनी स्पष्ट केले की, मालदीवचे परराष्ट्र धोरण नेहमीच ‘भारत प्रथम’ (India First) राहिले आहे. काही काळ निवडणुकांच्या राजकारणामुळे धोरण थोडे चीनकडे झुकले होते, मात्र आता भारताशी संबंध अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे. पंतप्रधान मोदींचा दौरा हे याचे उत्तम उदाहरण असल्याचे नशीद यांनी सांगितले.

व्यापार कराराची गरज

नशीद यांनी भारत आणि मालदीव यांच्यात व्यापार करार व्हावा, अशी सुचनाही दिली. त्यांच्या मते, भारतात मालदीवच्या माशांची मोठी मागणी आहे. व्यापार करार झाल्यास मालदीव भारताला अधिक प्रमाणात मासे शाश्वत पद्धतीने निर्यात करू शकेल, जे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल. यामुळे लॉजिस्टिक्स, शिपिंग आणि सागरी विकासाच्या क्षेत्रातही सहकार्य वाढेल.

भारतीय पर्यटकांची संख्या वाढण्याची आशा

पंतप्रधान मोदींच्या भेटीमुळे भारतीय पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढेल, अशी आशाही नशीद यांनी व्यक्त केली. सध्या भारताच्या ‘शेजारी प्रथम’ धोरणामुळे मालदीवला भरपूर आर्थिक संधी मिळत आहेत. विशेषतः भारताने मदतीने उभारलेला हनिमाडू विमानतळ जवळपास पूर्ण झाला असून, तो दक्षिण भारतातील अनेक शहरांपासून अवघ्या एका तासाच्या अंतरावर असेल, ही बाब पर्यटन वृद्धीसाठी महत्त्वाची ठरेल, असे नशीद यांनी नमूद केले.

You Might Also Like

अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारकडून अभ्यासक्रम — मंत्री आशिष शेलार यांचे आश्वासन

राजस्थानमध्ये शाळेची इमारत कोसळली; ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

पॅलेस्टाईनला स्वतंत्र देशाची मान्यता देणार – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन

पंतप्रधान मोदी ठरले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ सलग पदावर राहणारे पंतप्रधान

पंतप्रधान मोदी मालदीव दौऱ्यावर; राष्ट्रपती मुइझ्झूंनी केले उबदार स्वागत

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान मोदी लंडनमध्ये दाखल; भारत-ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होणार
Next Article रशियाचे ५० प्रवाशांसह विमान बेपत्ता; चीनच्या सीमेजवळ तुटला संपर्क

Latest News

अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारकडून अभ्यासक्रम — मंत्री आशिष शेलार यांचे आश्वासन
देश - विदेश July 25, 2025
राजस्थानमध्ये शाळेची इमारत कोसळली; ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी
देश - विदेश July 25, 2025
पॅलेस्टाईनला स्वतंत्र देशाची मान्यता देणार – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन
Top News देश - विदेश July 25, 2025
पंतप्रधान मोदी ठरले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ सलग पदावर राहणारे पंतप्रधान
देश - विदेश July 25, 2025
ब्रिटनने दहशतवादी मानसिकतेवर कठोर कारवाई करावी – पंतप्रधान मोदींचे आवाहन
Top News July 25, 2025
सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादकांची कोंडी; साखर कारखान्यांकडे ८५ कोटी रुपये थकीत
Top News July 25, 2025
पंतप्रधान मोदी मालदीव दौऱ्यावर; राष्ट्रपती मुइझ्झूंनी केले उबदार स्वागत
देश - विदेश July 25, 2025
‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द संविधानाच्या प्रस्तावनेतून काढण्याची कोणतीही योजना नाही – कायदा मंत्री मेघवाल
देश - विदेश July 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?