Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतक-यांना एकरी २० हजार व हेक्टरी ५० हजारांचे अनुदान तातडीने द्या – हर्षवर्धन सपकाळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शेतक-यांना एकरी २० हजार व हेक्टरी ५० हजारांचे अनुदान तातडीने द्या – हर्षवर्धन सपकाळ

admin
Last updated: 2025/05/27 at 6:17 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 27 मे । राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी २० हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा केले आहे. पिकावर रोग पडला, लाल्या पडल्या, गारपीट झाली, अवकाळी पावसाने नुकसान झाले की सरकारने कशाचीही पर्वा न करता शेतकऱ्याला मदत दिली आहे. आताचे सरकार मात्र शेतकऱ्याला मदत करण्याच्या विचाराचे नाही.

केवळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन, कोरडी आश्वासने देऊन चालणार नाही, शेतक-यांना तातडीने मदत पोहचवली पाहिजे. खरिप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफी अद्याप जाहीर केलेली नाही, कर्जाचे पुनर्गठन तरी करून द्यावे. सरकारचे खरिपाचे काहीच नियोजन नाही याकडेही लक्ष वेधून अडचणीत आलेल्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते द्यावीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

You Might Also Like

ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली – अमित शाह

मुंबई विमानतळावर बॉम्बची धमकी; संशयित ताब्यात

बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगींचा काँग्रेस पक्षात प्रवेश

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २,५८,८८७ विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्यातील अनुभवी शिक्षकांची होणार परीक्षा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान मोदी सिंदूरची लाली कायम ठेवतील!
Next Article पंजाब : मजिठा रोडवर बॉम्बस्फोट , एक जखमी

Latest News

ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली – अमित शाह
महाराष्ट्र May 27, 2025
मुंबई विमानतळावर बॉम्बची धमकी; संशयित ताब्यात
महाराष्ट्र May 27, 2025
बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगींचा काँग्रेस पक्षात प्रवेश
महाराष्ट्र May 27, 2025
पंजाब : मजिठा रोडवर बॉम्बस्फोट , एक जखमी
देश - विदेश May 27, 2025
पंतप्रधान मोदी सिंदूरची लाली कायम ठेवतील!
देश - विदेश May 27, 2025
इंडिगोचे संस्थापक गंगवाल 3.4 टक्के भांडवल विकणार
देश - विदेश May 27, 2025
कर्नाटक : भाजपच्या 2 आमदारांची पक्षातून हकालपट्टी
देश - विदेश May 27, 2025
पाकिस्तानच्या विनंतीवर झाला युद्धविराम- एस. जयशंकर
देश - विदेश May 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?